शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार; पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 7:54 AM

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऐन गणेशोत्सवात राज्यावर अस्मानी संकट आले आहे. पुढील चार दिवसात मुंबई आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर केला असतानाच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामानात झालेल्या या उल्लेखनीय बदलामुळे चार ते पाच दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबईत सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, श्री गणेशाचे स्वागतदेखील वरूण राजाने मोठ्या थाटामाटात केले. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. पावसाने संततधार कायम ठेवली असली तरीदेखील गणेश भक्तांचा उत्साह कायम होता.

पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट

- कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर कायम राहील. जिल्ह्याचा विचार करता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

- तर १३ आणि १४ सप्टेंबर रोजी गोवा, कोकण याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र