शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 19:57 IST

नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nana Patole On DGP Sanjay Kumar Verma : महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीवरुन राजकारण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून संजय कुमार वर्मा यांच्या सशर्त नियुक्तीबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची डीजीपी पदावर सशर्त नियुक्ती करणे हे घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि प्रस्थापित प्रशासकीय तत्त्वांचे उल्लंघन असल्याचा आरोप या पत्रातून केला आहे.

पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थपणे व निःपक्षपातीपणे काम करण्यास अडचणी येणार असल्याचे नाना पटोले आपल्या पत्रात म्हणाले आहेत. संजय कुमार वर्मा यांच्या तात्पुरत्या नियुक्तीच्या आदेशावर निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नाना पटोले यांचे EC ला पत्रनाना पटोले आपल्या पत्रात लिहितात, "निवडणूक आयोगाने घटनेच्या कलम 324 अन्वये घटनात्मक अधिकार वापरून, 5 नोव्हेंबर 2024 रोजी संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलीस दलाने निष्पक्ष आणि तटस्थ भूमिका बजावावी, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या या सूचनेचे उल्लंघन करून महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांच्या नियुक्तीला आचारसंहितेनुसार मर्यादा घालण्याचा/नियुक्ती आचार संहितेपर्यंत करणारा आदेश जारी केला आहे.'

"संजय कुमार वर्मा यांच्या सशर्त नियुक्तीमुळे पोलिस दलाचे नेतृत्व आणि प्रशासकीय सातत्य धोक्यात आले आहे. निवडणुकीनंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा डीजीपी म्हणून नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा हेतू असेल, तर त्यामुळे कायदेशीर आणि प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते. बेट लावल्याने डीजीपीच्या कामगिरीवरही परिणाम होतो. पोलीस महासंचालक आणि मतदानोत्तर पोलीस महासंचालक यांची नियुक्ती प्रशासनाच्या मूलभूत घटनात्मक तत्त्वांवर, पदानुक्रमावर आणि अधिकारांचे पृथक्करण यावर परिणाम करते. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलन बिघडू शकते आणि कायदेशीर अनिश्चितता निर्माण होऊ शकते," असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग