शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

विखेंचं नेटवर्क कमी पडलं ? टळला नाही 'या' नेत्यांचा पराभव !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 3:29 PM

नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये सामील करून घेत मंत्रीपद देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी विखेंची मदत होईल, अशी योजना भाजपची होती. मात्र विखे पाटील महाराष्ट्रातील सोडाच पण, आपल्या नगर जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांनाही पराभवापासून वाचवू शकले नाही.

शेवटचे सहा महिने मंत्रीपद मिळवणारे विखे शिर्डीतून विजयी झाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर विखेंनी जिल्ह्यात विरोधकांना 12-0 अशी मात देऊ अशी घोषणाही केली होती. त्यासाठी रणनितीही आखली होती. मात्र बाळासाहेब थोरात यांनी त्यांची योजना हाणून पाडली. नगर जिल्ह्यातील तब्बल 9 जागांवर युतीचा पराभव झाला.

नगरमधील अकोले मतदार संघातून वैभव पिचड, नेवासेमधून बाळासाहेब मुरकुटे, कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूरमधून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे, राहुरीतून शिवाजी कर्डिले, पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी, अहमदनगर शहरमधून अनिल राठोड, कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकूणच या नेत्यांचा पराभव विखेही टाळू शकले नाही, अशी चर्चा नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे.