शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 2:55 PM

येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा.

ठळक मुद्देसरकारी मदत हा शेवटचा पर्यायकेंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूकदुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनसाखर कारखान्यांना कर्ज देऊ नका

पुणे : आर्थिक अडचणीतील बँका इतर सक्षम बँकांनी विलिनीकरण करुन घेतल्यास बँकिंग व्यवसाय सुरळीत होईल. अडचणीतील बँकेला सरकारने मदत करावी हा उपाय अगदी शेवटचा असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बँकांच्या विलिनीकरणावर भाष्य केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना बँकींग रत्न आणि सहकारी बँकींग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शीला काळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

गडकरी म्हणाले, येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा. एखादी चूक झाल्यास नागरीक जाब विचारतील. सहकार क्षेत्राविषयी लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण होईल हे पाहिले पाहीजे. आज एकही खाते अनुत्पादित (एनपीए) होणारच नाही, असे नाही. याचा अर्थ कोणा संचालकांनी चुकीचा व्यवहार करु नये. अशा संचालकांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सरसकट सर्व संचालकांना जबाबदार धरुन चालणार नाही. सहकारी बँकीग क्षेत्राने या पुढे व्यावसायिक दृष्टीकोन (प्रोफेशनल अ‍ॅप्रोच) ठेवून काम केले पाहीजे. ‘राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका या एकाच प्रकारचे काम करतात. मात्र, केंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूक दिली जाते. राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्यास सरकार त्यांना पॅकेज देते. सहकारी बँकांना मात्र, अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडले जाते. केंद्र सरकारने सहकारी बँकांना किमान बँक गॅरंटीचा अधिकार द्यावा अशी मागणी सहकार मंत्री देशमुख यांनी केली. तसेच, दुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.  --------------------साखर कारखान्यांना कर्ज देऊ नका : गडकरीपश्चिम महाराष्ट्रातील कारखाने ७५ टक्के, मराठवाडा ६० टक्के आणि विदर्भातील कारखाने २५ टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांसारखे आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना कृपया कर्ज वितरण करु नका. मात्र, त्यांना उसापासून थेट इथेनॉल प्रकल्प उभारायचा असेल तर कर्ज वितरण नक्की करा, असा व्यावसायिक सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी बँकांना दिला. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीbankबँकSugar factoryसाखर कारखाने