शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 15:09 IST

येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा.

ठळक मुद्देसरकारी मदत हा शेवटचा पर्यायकेंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूकदुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनसाखर कारखान्यांना कर्ज देऊ नका

पुणे : आर्थिक अडचणीतील बँका इतर सक्षम बँकांनी विलिनीकरण करुन घेतल्यास बँकिंग व्यवसाय सुरळीत होईल. अडचणीतील बँकेला सरकारने मदत करावी हा उपाय अगदी शेवटचा असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बँकांच्या विलिनीकरणावर भाष्य केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना बँकींग रत्न आणि सहकारी बँकींग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शीला काळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

गडकरी म्हणाले, येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा. एखादी चूक झाल्यास नागरीक जाब विचारतील. सहकार क्षेत्राविषयी लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण होईल हे पाहिले पाहीजे. आज एकही खाते अनुत्पादित (एनपीए) होणारच नाही, असे नाही. याचा अर्थ कोणा संचालकांनी चुकीचा व्यवहार करु नये. अशा संचालकांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सरसकट सर्व संचालकांना जबाबदार धरुन चालणार नाही. सहकारी बँकीग क्षेत्राने या पुढे व्यावसायिक दृष्टीकोन (प्रोफेशनल अ‍ॅप्रोच) ठेवून काम केले पाहीजे. ‘राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका या एकाच प्रकारचे काम करतात. मात्र, केंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूक दिली जाते. राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्यास सरकार त्यांना पॅकेज देते. सहकारी बँकांना मात्र, अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडले जाते. केंद्र सरकारने सहकारी बँकांना किमान बँक गॅरंटीचा अधिकार द्यावा अशी मागणी सहकार मंत्री देशमुख यांनी केली. तसेच, दुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.  --------------------साखर कारखान्यांना कर्ज देऊ नका : गडकरीपश्चिम महाराष्ट्रातील कारखाने ७५ टक्के, मराठवाडा ६० टक्के आणि विदर्भातील कारखाने २५ टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांसारखे आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना कृपया कर्ज वितरण करु नका. मात्र, त्यांना उसापासून थेट इथेनॉल प्रकल्प उभारायचा असेल तर कर्ज वितरण नक्की करा, असा व्यावसायिक सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी बँकांना दिला. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीbankबँकSugar factoryसाखर कारखाने