शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अजित पवार महाराष्ट्राचे बहुरूपी; जितेंद्र आव्हाडांनी नक्कल करत डोक्यालाच लावला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:22 IST

वेशांतर करून दिल्लीला अमित शाहांना भेटायला जायचो असं अजित पवारांनी खुलासा केल्यानंतर त्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आव्हाडांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. 

मुंबई - महाराष्ट्रात बहुरूपी नावाचा खेळ चालायचा, तो वेगवेगळी रुपे घेऊन यायचा, महाराष्ट्राला एवढा मोठा बहुरूपी कलाकार मिळाला. त्यांचे कानटोप्या घातलेले, गॉगल लावलेले फोटो काढूनही ठेवले होते. माणसाच्या चारित्र्यात हे सगळं रचलेले असते. ते किती रूप बदलू शकतात, करायचे तर निधड्या छातीने करायचे..मी कोणाला घाबरत नाही, जे करतो समोर करतो, केले म्हणजे केले अशी नक्कल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यात ते म्हणाले की, जे काही केले टोपी घालून, गॉगल घालून, रेनकोट घालून..महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्यापेक्षा महाराष्ट्राला भूषवणारा चांगला उपमुख्यमंत्री मिळायला हवा. माणूस म्हणून जगायचं असेल ताठमानेने जगा, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करून आपला वेश बदलायचा म्हणजे तुम्ही स्वत:ला बदलताय. यापुढे बहुरूपी म्हणून चित्रपटात चांगली ऑफर येऊ शकते. नशीब दाढी वाढलेले फोटो पाठवले नाहीत असा टोला आव्हाडांनी लगावला.

त्याचसोबत ही बातमी एका खासदाराच्या घरी जेवताना तिथल्या पत्रकारांना सांगितली. बातमी हायलाईट कशी झाली नाही यासाठी फोनही केले. माझी बातमी लावा याची किती हौस, महाराष्ट्राच्या विकासाची बातमी लावायची होती. मी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला गेलो नाही. त्याची भरपाई महाराष्ट्राला मदत करेन. मी महाराष्ट्राची क्षमा मागतो. मी भाजपा नेतृत्वाला भेटायला रात्री १ ला जायचो, ५ वाजता परत यायचो. ते मी केले परंतु जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला गेलो नाही हे सांगायचे होते. वेशभूषा करून गेलो, याच्या तुम्ही बातम्या का लावत नाहीत असं विचारायचं, यावर काय बोलायचं असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी डोक्यावरच हात मारून घेतला. 

दरम्यान, लोकशाहीत आपल्या आधार कार्डावरचं नाव बोर्डिंग पासवर नसणे, तिकिटावर नाव नसणे याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या आधारकार्डावर अजित अनंतराव पवार असं असेल तेच नाव बोर्डिंग पासवर हवं. दुसरं नाव छापलेच कसे, ज्या एअरलाईन्सनं दिलं त्यांनाही गुन्ह्यात घ्या. उद्या कुणीही अतिरेकी नाव बदलून जाईल. तुमच्या नावाला जे शासकीय नोंदवहीत आहे त्याला काही किंमतच नाही. राष्ट्रीय सुरक्षेची मस्करी लावली का? हे गांभीर्याने घेतले पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी कायद्याचे तुकडे तुकडे केले. उपमुख्यमंत्री होण्यासाठी काकाला ढकलून द्यायचं होतं. ए अनंतराव पी हे खोटं नाव ऐकून मला हसू आलं असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा