शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दलित वर्गाला आकर्षित करण्याची राष्ट्रवादीची योजना; अजित पवारांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 12:49 IST

दोन घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजाकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सत्ता असल्यामुळे हे काम आणखी सोप होणार आहे. 

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपची वाढलेली ताकद आणि वाढत्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी एकमेकांचे शत्रु असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. सत्तेत राहून पक्षविस्तार करण्याचे तिन्ही पक्षांनी निश्चित केले. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दलितांना एकत्र करण्याची योजना राष्ट्रवादीची असल्याचे दिसून येते आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दलित समाज एकमताने वंचित बहुजन आघाडीकडे अर्थात प्रकाश आंबेडकरांच्या मागे होता. दलित समाजाने लोकसभेला ताकद उभी केल्यामुळे वंचितला लक्षवेधी मते मिळाली होती. मात्र विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव दिसला नाही. 

एकेकाळी दलित आणि मुस्लीम ही काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी व्होटबँक होती. मात्र मागील काही वर्षांपासून वंचित आणि एमआयएमच्या उदयामुळे मुस्लीम समाज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेला आहे. या समाजांना जवळ आणण्यासाठी राष्ट्रवादीने पावले उचलली आहेत. 

नुकत्याच झालेल्या शौर्य दिनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन केले. सकाळी 7 वाजताच ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी शौर्यस्तंभास असलेल्या इतिहासाबद्दल उद्गगार काढले. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा  येथे राज्यभरातून दलित वर्ग विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतो. 

या व्यतिरिक्त अजित पवार यांनी इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केली. तसेच इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे या महिन्यात काम सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याच महिन्यात देण्यात येईल.  पुढील दोन वर्षांत अर्थात 14 एप्रिल 2022 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. 

या दोन घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजाकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सत्ता असल्यामुळे हे काम आणखी सोप होणार आहे.  

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना