शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

परस्पर निर्णय घेता येणार नाही; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवर उदयनराजेंचं रोखठोक मत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 2:38 PM

राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. शरद पवार पक्षाचं नेतृत्व करतील आणि राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाशी लढतील, असं समीकरण मांडलं जातंय.हे पाऊल कार्यकर्त्यांना तरी कितपत रुचेल, पचेल, याबद्दल शंकाच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीत. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांना मात्र ते भेटले, त्यांच्याशी बोलले. या भेटीनंतर, राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रोखठोक मत मांडलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेबद्दल मला काही माहीत नाही. परंतु, हा निर्णय असाच घेता येणार नाही. माझ्याशी आणि इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पक्षाचे विलिनीकरण का करायचे, ते कोणत्या पक्षात करायचे, हे सगळं आम्हाला सांगितलं पाहिजे. सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ५२ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकणार नाही. काँग्रेसच्या या अपयशाची जबाबदारी स्वीकारूनच राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अर्थात, पक्षातील नेत्यांना त्यांचं हे टोकाचं पाऊल पटलेलं नाही. परंतु, राहुल गांधी कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. असं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. शरद पवार पक्षाचं नेतृत्व करतील आणि राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाशी लढतील, असं समीकरण मांडलं जातंय. अर्थात, दोघांपैकी कुठल्याच राजकीय पक्षाकडून काही ठोस संकेत दिले गेलेले नाहीत, पण पवार-राहुल भेटीनंतर चर्चा जोरात सुरू झालीय. हे पाऊल कार्यकर्त्यांना तरी कितपत रुचेल, पचेल, याबद्दल शंकाच असल्याचं उदयनराजेंच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट जाणवतं. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९