शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Jayant Patil : "चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता"; जयंत पाटलांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 15:15 IST

NCP Jayant Patil And Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली आहे.

भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. यानंतर आता चित्त्यांवरून राजकीय पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादीने यावरूनच पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. "चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता" असं म्हणत घणाघात केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली आहे. चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. चित्त्यांना जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातं तसं द्यायला पाहिजे… पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावरून निशाणा साधला आहे. 

"चित्ते आले ठीक आहे पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?"

अजित पवार (Ajit Pawar) यांनी "बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात... महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचं काय होणार ते सांगा?" असा सवाल विचारला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?"

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा आम्हाला पेंग्विन सरकार म्हणायची, आता त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?" असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. "राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्ही चित्ता आणलेत तर तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का?" असा प्रश्न विचारला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्या केसवरूनही हल्लाबोल केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहे का? मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा