शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
3
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
4
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
5
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
6
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
7
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
8
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
9
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
10
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
11
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
12
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
13
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
14
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
15
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
16
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
17
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
18
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
19
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
20
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण

Maharashtra Political Crisis: “नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 11:59 IST

Maharashtra Political Crisis: राज्यपालाच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी ईडी कारवाईचा संबंध राज्यपालांनी केलेल्या विधानाशी जोडत भाजपवर टीका केली आहे. 

राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी. आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला, अशी घणाघाती टीका केली आहे. दुसरीकडे, राऊत यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होतेय ही बाब अंगणवाडीतला मुलगाही सांगेल. संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याने शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपने ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत. ईडीच्या कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेक नेते भाजपसोबत गेले. शिवसेनेचे आमदार फुटले. मात्र या संकट काळातही राऊत पक्षासोबत राहिले. त्यांनी पक्ष नेतृत्त्वाची साथ सोडली नाही. ही बाब महाराष्ट्र विसरणार नाही. राऊतांनी ईडीसमोर गुडघे टेकले नाहीत. अनेक आमदार पक्ष सोडून गेले असतानाही राऊत यांनी एकहाती किल्ला लढवला, याची दखल इतिहासात घेतली जाईल, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचे समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल, असे वाटत आहे. झुकेगा नहीं वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असे त्यांना वाटायचे. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीSanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस