शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

Maharashtra Political Crisis: “नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 11:59 IST

Maharashtra Political Crisis: राज्यपालाच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी ईडी कारवाईचा संबंध राज्यपालांनी केलेल्या विधानाशी जोडत भाजपवर टीका केली आहे. 

राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी. आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला, अशी घणाघाती टीका केली आहे. दुसरीकडे, राऊत यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होतेय ही बाब अंगणवाडीतला मुलगाही सांगेल. संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याने शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपने ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत. ईडीच्या कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेक नेते भाजपसोबत गेले. शिवसेनेचे आमदार फुटले. मात्र या संकट काळातही राऊत पक्षासोबत राहिले. त्यांनी पक्ष नेतृत्त्वाची साथ सोडली नाही. ही बाब महाराष्ट्र विसरणार नाही. राऊतांनी ईडीसमोर गुडघे टेकले नाहीत. अनेक आमदार पक्ष सोडून गेले असतानाही राऊत यांनी एकहाती किल्ला लढवला, याची दखल इतिहासात घेतली जाईल, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचे समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल, असे वाटत आहे. झुकेगा नहीं वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असे त्यांना वाटायचे. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीSanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस