शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:33 IST

NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

NCP Ajit Pawar Group News ( Marathi News ): गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याबाबत भाष्य केले असून, सुप्रिया सुळे या गेल्या १५ वर्षांपासून अजित पवार यांच्यामुळे निवडून येत आहेत. आता अजितदादा सोबत नाही म्हटल्यावर मतदारसंघात तळ ठोकावा लागत आहे, या शब्दांत रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना दिसत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला. नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. यानंतर अमोल कोल्हे यांनीही पलटवार केला. दोघांमधील वादाबाबत दोन्ही गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देताना एकमेकांवर टीका केली. यात आता सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

भावनिक राजकारण आता संपलेले आहे

जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत, त्या दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणले आहे. दादांमुळेच ते निवडून आले. त्यांच्या अफाट आणि विराट सभांमध्ये रिकाम्या खुर्च्यांशिवाय काही दिसले नाही. भावनिक राजकारण आता संपलेले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. जे खासदार दादांवर बोलतात, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. ताईंना १० महिने तळ ठोकावा लागला, असे सांगितले तर याचाच अर्थ असा की, दादा होते, तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी यावे लागत होते. दादा सोबत नाही म्हणून १० महिने तळ ठोकावा लागत आहे. दादांवर बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही, या शब्दांत रुपाली चाकणकर यांनी हल्लाबोल केला. 

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा

अजित पवारांनी निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आहे. अनेक चांगले निर्णय घेतले अजित पवारांनी घेतले आहे. १८ जानेवारीला मुबंईत महिला मेळावा आयोजित केला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. यासाठी आम्हाला काम करावे लागेल. आमचे स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे