शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 14:31 IST

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातोयाठिकाणी ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे.वटवृक्ष तोडण्यास स्थानिकांनी विरोध केला होता, आदित्य ठाकरेंनीही केंद्राला पत्र पाठवलं होतं

सांगली – भौसे येथील ४०० वर्ष जुना वटवृक्ष तोडण्याला विरोध झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चं काम सुरु असताना या मार्गात येणाऱ्या ४०० वर्ष जुना वटवृक्ष तोडावा लागणार होता. मात्र स्थानिकांनी याचा विरोध करत चिपको आंदोलन केले होते.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं. सोशल मीडियातही अनेक पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष तोडण्यास विरोध केला होता. अखेर या सर्व प्रकाराची दखल घेत नितीन गडकरींनी महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मिरज ते पंढरपूर दरम्यान भौसे येथून जातो. गावातील गट क्रमांक ४३६ इथं यलम्मा देवीचं मंदिर असून त्यासमोर ४०० वर्षे जुना वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचा विस्तार ४०० चौरस मीटर इतका आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा असून तो वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षांसाठी नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे, असं आदित्य यांनी गडकरींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. वटवृक्षाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संबंधित जागेवरील महामार्गाचं संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचं जतन करण्याची विनंती आदित्य यांनी केली होती.

चारशे वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी चिपको आंदोलन सुरू केलं होतं. आजपर्यंत या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यावरील अनेक झाडं तोडली गेली. त्याला कोणी विरोध केला नाही. मात्र ४०० वर्षांहून अधिक जुना वटवृक्ष असल्यानं त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी सरसावले. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवारानं वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती.

गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी महामार्गाचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याबद्दल गडकरी यांचं कौतुकदेखील केलं होतं. या महामार्गाचा परिसरातल्या शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल. त्याबद्दल आपला आभारी असल्याचं ठाकरेंनी पत्रात म्हटलं होतं. आता हे पत्र आणि स्थानिकांच्या मागणीची दखल घेत नितीन गडकरींनी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलण्याचे आदेश दिले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या  

कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'

...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गNitin Gadkariनितीन गडकरीAaditya Thackerayआदित्य ठाकरे