शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:12 IST

नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असं पटोले म्हणाले.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. याठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला. तर ही भाजपाचीच खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं. 

त्यात आता सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मुलाला अपक्ष फॉर्म भरून भाजपाचा पाठिंबा घेणार म्हटलं आहे. हा एकप्रकारे विश्वासघात आहे. हायकमांडला आम्ही सगळे कळवले आहे. त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट करू. काँग्रेस बंडखोराला पाठिंबा देणार नाही. सगळं ठरलेला कार्यक्रम होता. भाजपाने त्याठिकाणी फॉर्म भरला नाही. त्यामुळे पदवीधर मतदार अडाणी नाहीत. त्यांना सगळं कळतेय. भाजपा भय दाखवून घरं तोडण्याची कामे करतंय. भाजपाला त्याचा आनंद होतोय. ज्यादिवशी भाजपाचं घर फुटेल तेव्हा इतरांची घरे फुटण्याचं दु:ख कळेल असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे. 

बाळासाहेब थोरात दुपारपर्यंत संपर्कात होते, पण आता...; दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर बाळासाहेब थोरात संपर्कात होते का अशी विचारणा पत्रकारांनी नाना पटोलेंना केली. तेव्हा काल दुपारपर्यंत ते संपर्कात होते. पण त्यानंतर संपर्कात नाही असंही स्पष्ट केले आहे. 

...तर सरकारला जाब विचारूराज्यात MPSC परीक्षांसाठी मुलांनी मागील ३-४ वर्षापासून तयारी केल्यात. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होतील असं शासनानं ठरवले. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसनं विधानसभेतही केली आहे. २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करावा. राज्य शासनाकडून जो अन्याय सुरू आहे त्याचा निषेध करतो. विद्यार्थ्यांनी जे राज्यव्यापी आंदोलन उभारलं आहे त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार जर गरीब मुलांचे ऐकत नसेल तर काँग्रेस जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपा