शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 12:12 IST

नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असं पटोले म्हणाले.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. याठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला. तर ही भाजपाचीच खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं. 

त्यात आता सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मुलाला अपक्ष फॉर्म भरून भाजपाचा पाठिंबा घेणार म्हटलं आहे. हा एकप्रकारे विश्वासघात आहे. हायकमांडला आम्ही सगळे कळवले आहे. त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट करू. काँग्रेस बंडखोराला पाठिंबा देणार नाही. सगळं ठरलेला कार्यक्रम होता. भाजपाने त्याठिकाणी फॉर्म भरला नाही. त्यामुळे पदवीधर मतदार अडाणी नाहीत. त्यांना सगळं कळतेय. भाजपा भय दाखवून घरं तोडण्याची कामे करतंय. भाजपाला त्याचा आनंद होतोय. ज्यादिवशी भाजपाचं घर फुटेल तेव्हा इतरांची घरे फुटण्याचं दु:ख कळेल असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे. 

बाळासाहेब थोरात दुपारपर्यंत संपर्कात होते, पण आता...; दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर बाळासाहेब थोरात संपर्कात होते का अशी विचारणा पत्रकारांनी नाना पटोलेंना केली. तेव्हा काल दुपारपर्यंत ते संपर्कात होते. पण त्यानंतर संपर्कात नाही असंही स्पष्ट केले आहे. 

...तर सरकारला जाब विचारूराज्यात MPSC परीक्षांसाठी मुलांनी मागील ३-४ वर्षापासून तयारी केल्यात. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होतील असं शासनानं ठरवले. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसनं विधानसभेतही केली आहे. २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करावा. राज्य शासनाकडून जो अन्याय सुरू आहे त्याचा निषेध करतो. विद्यार्थ्यांनी जे राज्यव्यापी आंदोलन उभारलं आहे त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार जर गरीब मुलांचे ऐकत नसेल तर काँग्रेस जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपा