शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

काँग्रेसमधून अनेक जण राजीनामा देणार होते, पण...; सत्यजित तांबेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 6:05 PM

सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात असं सत्यजित तांबे म्हणाले.

अहमदनगर - बाळासाहेब साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरे तर महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी राजीनामा देणार होते. मी प्रत्येकाला सांगितले कुणीही राजीनामा देण्याचं आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापलं काम करा. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. मागील १०० वर्ष कुटुंबावर आणि काँग्रेस पक्षासोबत काम केलेय. त्यामुळे कुठेही काहीही निर्णय घेता कामा नये. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील. जेव्हा वेळ येईल तेव्हा सविस्तर यावर विषयावर बोलूच असा निरोप राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना दिला असा दावा नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे. 

सत्यजित तांबे म्हणाले की, सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात. आम्ही आणि आमच्या कुटुंबाने कधीही पक्षीय, जातीय आणि धार्मिक भेद पाहिले नाहीत. जो येईल त्या माणसाची मदत करण्याची भूमिका कुटुंबाने घेतली. सगळे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेत. २२ वर्ष संघटनेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक जीवनात काम करतोय. २००० साली NSUI च्या माध्यमातून मी पक्षीय राजकारणाला सुरूवात केली. राज्याचा युवक अध्यक्ष म्हणून काम केले. मी देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या कामासाठी गेलो असेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचं काम करत आलोय. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे कडवट कार्यकर्ते होते त्यांचे विचार होते नवी पिढी पुढे यायला हवी. मोठ्या व्यासपीठावर हे काम मांडण्याची गरज आहे. त्यातून या निवडणुकीत उभा राहिलो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सर्व शिक्षक संघटनांचे आभार ज्यांनी माझ्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या ७-८ दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे त्यातून सगळ्यांनी तांबे कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याचे आभार आहोत. हा मतदारसंघ छोटा नाही. अहिल्याबाईंचे जन्मगाव असल्यापासून गुजरात, मध्य प्रदेशाच्या बोर्डरपर्यंत हा मतदारसंघ आहे. ४ हजार गावे आहेत. या भव्य मतदारसंघात गेल्या १४ वर्षापासून सुधीर तांबे यांनी जनसंपर्क ठेवला. इतके मोठे काम कुठल्याच लोकप्रतिनिधींनी केले नसेल जितके सुधीर तांबे यांनी केले. सर्वात जास्त फिरणारे आमदार म्हणून सुधीर तांबेंचा उल्लेख होतो. दिवसाला ४०० किमीचा प्रवास केला. प्रत्येक दुर्मिळ भागात सुविधा पोहचवण्याचं काम सुधीर तांबे यांनी केले असंही सत्यजित तांबेंनी म्हटलं. 

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेस