शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:34 IST

Loksabha Election - उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला. त्यावर उद्धव ठाकरे शब्दाला पक्के, त्यांनी मविआ सरकार प्रदीर्घ काळ चालवण्याचं ठरवलं होते असं संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) दिल्लीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अशोक चव्हाण, अजित पवारही सोबत होते. या बैठकीनंतर मोदी-ठाकरेंची चर्चा झाली. त्या चर्चेत मोदींनी पुन्हा एकत्र येण्याची ऑफर उद्धव ठाकरेंना दिली होती असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, सुनील तटकरेंनी केलेला दावा चुकीचा आहे. मविआत समन्वय असावा यासाठी आम्ही वारंवार भेटत होतो. प्रत्यक्ष कॅबिनेटमधले काम वेगळे असते, बाहेर कार्यकर्ते काम करतात, नेतृत्व करत असतात, त्यामुळे एकमेकांसोबत अदान प्रदान केले पाहिजे. पण पंतप्रधानाच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत अशोक चव्हाण, अजित पवारही होते. काही काळ ते दोघे बाहेर थांबले, त्यानंतर मोदी-ठाकरे चर्चेबाबत अनेक गोष्टी बाहेर आल्या. भाजपासोबत नक्की का युती तुटली यावर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. हे स्वत: उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मोदींच्या मनात असं आहे आपण पुन्हा एकत्र यायला हवे असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. त्यात चुकीचे काही नाही असं राऊतांनी म्हटलं. 

त्याशिवाय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेची बातमीही प्रसिद्ध माध्यमात आली होती. अजित पवार, सुनील तटकरे, मी आम्ही जेव्हा बसलो, तेव्हा राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. सहकारी म्हणून आम्ही बैठकीला बसलो होतो. मी अजित पवारांनाही विचारले, तुम्ही पंतप्रधानांना भेटला तुमचं काय बोलणं झाले? पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही ठरलं नव्हते. भाजपासोडून हा नवीन मार्ग का स्वीकारावा लागला, आमची फसगत कशारितीने झाली, हे उद्धव ठाकरेंनी मोदींना सांगितले. ही माहिती माझ्याकडे आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, आज जे सर्व सांगितलं जातं, त्या चर्चा जाहीरपणे झाल्या नाहीत. पडद्यामागे कोण काय करतंय, भेटत होते, याविषयी पुरावे नसतात. सत्य-असत्य सांगू शकत नाही. अजित पवार नेहमी सांगतात, त्यांना शरद पवारांनी भाजपासोबत जायचं आहे, तुम्ही चर्चा करा, असं म्हणतात. परंतु शरद पवार हे नाकारतात. ज्या लोकांनी पक्षांतरे केली, पक्ष सोडले, ते जर अशी विधाने करत असतील तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? शिवसेनेने कुणाशी चर्चा केली नाही. २०१९ निकालानंतर शिवसेनेने जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. पडद्यामागून केली नाही. इतक्या वर्षानंतर त्या काळात आम्ही कुणाशी काय चर्चा केली, यावर मी विश्वास ठेवत नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. ABP माझाच्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले. 

उद्धव ठाकरे शब्दाला पक्के...

उद्धव ठाकरे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत. उद्धव ठाकरेंनी कधीही आपला शब्द फिरवला आहे हे ते राजकारणात आल्यापासून दाखवा. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती तीच उद्धव ठाकरेंची आहे. एक सरकार बनवलं असताना त्या सरकारशी काडीमोड घेऊन असा कुठलाही निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं मला वाटत नाही. त्यांनी एकदा ठरवलं होते, या मार्गाने पुढे जायचे आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, आपला विश्वासघात केला. हे आपल्याला पटलं नाही. ३ पक्षाने मिळून स्थापन केलेले सरकार आपल्याला प्रदीर्घ चालवायचे आहे हे त्यांनी ठरवलं होते असं सांगत संजय राऊतांनी सुनील तटकरेंचा दावा फेटाळून लावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीsunil tatkareसुनील तटकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४