शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:34 IST

Loksabha Election - उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला. त्यावर उद्धव ठाकरे शब्दाला पक्के, त्यांनी मविआ सरकार प्रदीर्घ काळ चालवण्याचं ठरवलं होते असं संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) दिल्लीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अशोक चव्हाण, अजित पवारही सोबत होते. या बैठकीनंतर मोदी-ठाकरेंची चर्चा झाली. त्या चर्चेत मोदींनी पुन्हा एकत्र येण्याची ऑफर उद्धव ठाकरेंना दिली होती असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, सुनील तटकरेंनी केलेला दावा चुकीचा आहे. मविआत समन्वय असावा यासाठी आम्ही वारंवार भेटत होतो. प्रत्यक्ष कॅबिनेटमधले काम वेगळे असते, बाहेर कार्यकर्ते काम करतात, नेतृत्व करत असतात, त्यामुळे एकमेकांसोबत अदान प्रदान केले पाहिजे. पण पंतप्रधानाच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत अशोक चव्हाण, अजित पवारही होते. काही काळ ते दोघे बाहेर थांबले, त्यानंतर मोदी-ठाकरे चर्चेबाबत अनेक गोष्टी बाहेर आल्या. भाजपासोबत नक्की का युती तुटली यावर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. हे स्वत: उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मोदींच्या मनात असं आहे आपण पुन्हा एकत्र यायला हवे असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. त्यात चुकीचे काही नाही असं राऊतांनी म्हटलं. 

त्याशिवाय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेची बातमीही प्रसिद्ध माध्यमात आली होती. अजित पवार, सुनील तटकरे, मी आम्ही जेव्हा बसलो, तेव्हा राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. सहकारी म्हणून आम्ही बैठकीला बसलो होतो. मी अजित पवारांनाही विचारले, तुम्ही पंतप्रधानांना भेटला तुमचं काय बोलणं झाले? पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही ठरलं नव्हते. भाजपासोडून हा नवीन मार्ग का स्वीकारावा लागला, आमची फसगत कशारितीने झाली, हे उद्धव ठाकरेंनी मोदींना सांगितले. ही माहिती माझ्याकडे आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, आज जे सर्व सांगितलं जातं, त्या चर्चा जाहीरपणे झाल्या नाहीत. पडद्यामागे कोण काय करतंय, भेटत होते, याविषयी पुरावे नसतात. सत्य-असत्य सांगू शकत नाही. अजित पवार नेहमी सांगतात, त्यांना शरद पवारांनी भाजपासोबत जायचं आहे, तुम्ही चर्चा करा, असं म्हणतात. परंतु शरद पवार हे नाकारतात. ज्या लोकांनी पक्षांतरे केली, पक्ष सोडले, ते जर अशी विधाने करत असतील तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? शिवसेनेने कुणाशी चर्चा केली नाही. २०१९ निकालानंतर शिवसेनेने जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. पडद्यामागून केली नाही. इतक्या वर्षानंतर त्या काळात आम्ही कुणाशी काय चर्चा केली, यावर मी विश्वास ठेवत नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. ABP माझाच्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले. 

उद्धव ठाकरे शब्दाला पक्के...

उद्धव ठाकरे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत. उद्धव ठाकरेंनी कधीही आपला शब्द फिरवला आहे हे ते राजकारणात आल्यापासून दाखवा. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती तीच उद्धव ठाकरेंची आहे. एक सरकार बनवलं असताना त्या सरकारशी काडीमोड घेऊन असा कुठलाही निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं मला वाटत नाही. त्यांनी एकदा ठरवलं होते, या मार्गाने पुढे जायचे आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, आपला विश्वासघात केला. हे आपल्याला पटलं नाही. ३ पक्षाने मिळून स्थापन केलेले सरकार आपल्याला प्रदीर्घ चालवायचे आहे हे त्यांनी ठरवलं होते असं सांगत संजय राऊतांनी सुनील तटकरेंचा दावा फेटाळून लावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीsunil tatkareसुनील तटकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४