शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा; बाळासाहेब थोरातांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 12:53 IST

गेल्या साडे पाच वर्षांत देशावरील कर्जाचा बोजा 71 टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप काँग्रेसेचे प्रवक्ते  प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला होता.

ठळक मुद्देमार्च २०१४ मध्ये एकूण कर्ज ५३.११ लाख कोटी रुपये होते, ते सप्टेंबर २०१९ मध्ये ९१.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षात देश दिवाळखोरीत काढला आहे.

मुंबई : देशावरील कर्जामध्ये 71 टक्क्यांची वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

गेल्या साडे पाच वर्षांत देशावरील कर्जाचा बोजा 71 टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप काँग्रेसेचे प्रवक्ते  प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला होता. तसेच हा बोजा उतरवणार कसा, असा सवालही त्यांनी केला होता. मार्च २०१४ मध्ये एकूण कर्ज ५३.११ लाख कोटी रुपये होते, ते सप्टेंबर २०१९ मध्ये ९१.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. कर्जात ३७.९ लाख कोटींची वाढ (७१.३६ टक्के) झाली. म्हणजेच प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ४१,२०० रुपयांवरून ६८,४०० रुपयांवर गेले. कर्ज प्रति माणशी २७,२०० रुपयांनी वाढले. साडेपाच वर्षांमध्ये प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ६६ टक्के म्हणजे दरवर्षी १०.३ टक्क्य़ांनी वाढले.

यावर थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षात देश दिवाळखोरीत काढला आहे. या सरकारला कुठलेही धोरण वा दिशा नसल्यामुळे आर्थिक आणीबाणी ओढवली आहे. त्यातूनच कर्जाचा बोजा वाढला आहे. खरे तर मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा आहे, अशी टीका थोरात यांनी केली. 

तसेच राहुल गांधी यांचेही ट्वीट त्यांनी रिट्विट केले आहे. आमच्या सरकारच्या काळात जीडीपी 7.5 टक्के, महागाई 3.5 टक्के होता. आता या उलट परिस्थिती मोदी सरकारने केली आहे. आता जीडीपी 3.5 टक्के आणि महागाई 7.5 टक्क्यांवर नेऊन ठेवली असून पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनाच पुढे काय करावे हे कळत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

राहुल गांधी पुन्हा येणार, काँग्रेसचे अध्यक्ष होणार; रिलॉन्चची जोरदार तयारी

आर्थिक मंदीचा फटका, सीमारेषेवरील जवानांना 2 महिन्यांचा भत्ता मिळेना 

धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच अधिक घोटाळे 

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई