शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंची सोनियांकडे राष्ट्रवादीची तक्रार, अजित पवार म्हणाले...ही तर परंपराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:51 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत कुटुंबात भांड्याला भांडं लागतच असतं.

कराड-

अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचं उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाला मदत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडे याबाबतची तक्रार केलेली असल्याची माहिती दिली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत कुटुंबात भांड्याला भांडं लागतच असतं. तक्रार करण्याची आपली परंपराच आहे, असं म्हटलं आहे. ते कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"नाना पटोलेंनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांच्या अधिकार आहे. तक्रार करण्याची परंपराच आहे. आम्हीही आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करत असतो. शेवटी एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं असं आपण म्हणतो. इथं तर तीन कुटुंब आहेत. मग भांड्याला भांड लागणारच. पण सरकार नीट चालावं याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शकतो आणि तेच आम्हा सर्वांचं उद्दीष्ट आहे", असं अजित पवार म्हणाले.  

"प्रत्येक पक्षाची ध्येय आणि विचार वेगवेगळे असतात. त्यांनी काय करावं आणि काय नाही याचा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे. देशात २४ पक्षांच्या एनडीएचं सरकार आपण पाहिलं आहे. यात हवेदावे आणि वाद होतच असतात. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच", असं अजित पवार म्हणाले. 

महाराष्ट्राची परंपरा आरोप-प्रत्यारोपांची नाही"सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे. देशासाठी आणि राज्यासाठी जे महत्वाचे विषय आहेत त्यालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा आरोप-प्रत्यारोपांची नाही. प्रत्येकानं सांमजस्याची भूमिका घेऊन लोकांसाठी काम केलं पाहिजे. मला विकासाबद्दल, पावसाळ्याबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि चालू समस्यांबद्दल विचारा. कुणी काय आरोप-प्रत्यारोप केले ते मला विचारू नका", असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस