शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

आठवीच्या पुस्तकातून क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव वगळले नाही; बालभारतीचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 19:52 IST

इयत्ता आठवीच्या पुस्तकात भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, असा उल्लेख आढळल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.

ठळक मुद्दे बालभारतीने सुखदेव यांना वगळल्याचा केला जात आहे आरोप

पुणे : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत कुर्बान हुसेन यांचा करण्यात आलेल्या उल्लेख चुकीचा नाही. तेही एक क्रांतीकारक होते. तसेच सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आल्याने त्यांचे नाव वगळले म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण बालभारतीचे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी दिले आहे.इयत्ता आठवीच्या पुस्तकातील ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या धड्यामध्ये ‘भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते,’ असा उल्लेख आहे. यामध्ये सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन यांच्या नाव जोडण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. बालभारतीने सुखदेव यांना वगळल्याचा आरोप केला जात आहे. याअनुषंगाने गोसावी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे बालभारतीची भुमिका स्पष्ट केली आहे. ‘हा धडा साहित्यिक यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे.

धड्यामध्ये क्रांतिकारकांबाबतची माहिती अभिप्रेत नाही. देशप्रेम भावना जाणीवजागृती याबाबत वर्गातील विद्यार्थ्यांशी झालेली आंतरक्रिया लेखकाने मांडलेली आहे. ती मुळ पुस्तकातून आहे तशी घेण्यात आली आहे. त्यामुळे कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख चुकीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. भाषा विषय पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात पाठ्यपुस्तकांमधील पाठ, कविता या मराठी भाषा विषय समिती व अभ्यासगटाकडून निवडण्यात येतात. त्यासाठी संबंधित भाषा विषयातील नामवंत साहित्यिक, लेख व कमी यांचे साहित्य हे अभ्यासक्रमाची गरज, उद्दिष्टे अभ्यासून तसेच साहित्याची योग्य ती पडताळणी करून विचारात घेतले जाते. मूळ साहित्यामध्ये व त्यातील आशयामध्ये बदल करण्याचा अधिकारी समितीस नसतो’, असे प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.‘कुर्बान हुसेन हे सोलापुर मधील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना दि. १२ जानेवारी १९३१ रोजी सहकाºयांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते सर्वपरिचित आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सोलापुर जिल्हा संकेतस्थळावरही देण्यात आली आहे. इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातील धडा क्रमांक ८ मध्ये सोलापुर सत्याग्रहाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे कार्य नमुद करण्यात आले आहे. याचबरोबर धडा क्रमांक १० मध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक मंडळाने सुखदेव यांचे नाव वगळले, ही बाब खरी नाही,’ असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.-----------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocial Mediaसोशल मीडिया