शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

तुम्ही कधीपासून आमच्या संसारावर डाऊट घेताय? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानं एकच हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 15:51 IST

तुम्हाला बोअर नाही होत का? कुछ नया बोलो यार; सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया

मुंबई: गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं काँग्रेसवर कुरघोडी केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीनं राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. तर नाना पटोलेंनी स्वत: किती पक्ष बदलले, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला.

काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नाराजी समोर येत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. सगळ्याच नात्यांमध्ये अशा गोष्टी घडत असतात, असं सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीचा संसार ५ वर्षे टिकणार का, असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला. त्यावर तुम्ही कधीपासून आमच्या संसाराबद्दल डाऊट घेताय? तुम्हाला बोअर नाही झालं का? कुछ नया बोलो यार, असं मिश्किल उत्तर सुळेंनी दिलं.

काँग्रेस, राष्ट्रवादीमधील कुरबुरींबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला सुळेंनी तुमचं लग्न झालंय का, असा प्रतिप्रश्न केला. 'प्रेमाच्या नात्यांमध्ये भांडणं होतच असतात. त्यामुळेच तर नातं अधिक घट्ट होतं. आमचं जे काही आहे, ते घरातलं आहे. राष्ट्रवादीचा कोणता नेता जाहीरपणे काही बोलतो का?', असा सवाल सुळेंनी केला.

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आम्ही बाहेर बोलत नाही. काही जण बाहेर बोलतात. काही जण घरातच बोलतात, हे सांगताना सुप्रिया सुळेंनी एका पत्रकाराला तुमचं लग्न झालंय का, असा प्रश्न विचारत कौटुंबिक उदाहरण दिलं. 'तुमची मावशी बाहेर मनमोकळेपणानं बोलत असेल. पण तुमची आई, बायको बाहेर बोलत नसतील. पण मेहुणी बाहेर बोलत असेल. व्यक्तीनुसार स्वभाव बदलत असतात. पण मनमोकळेपणानं बोलत राहायला हवं,' असं सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस