शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:13 IST

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

Badlapur School Crime : बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी बदलापुरात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल १० तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. वारंवार प्रयत्न करुनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही. शेवटी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेच्या निषेशासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. काही पालकांनी जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक १० तास ठिय्या मांडून बसले होते. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकांना तिथून हुसकावून लावलं. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे.

"महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला  आरसा दाखवण्याचे काम जनता करेल," असं नाना पटोले म्हणाले.

बदलापूरच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा आरोप

"कालचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती," असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

दरम्यान, बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या मुख्य आरोपीला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला पुन्हा २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. बदलापुरातील नामांकीत शाळेतील दोन चिमुकल्यांवर अक्षयनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbadlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे