शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

पानशेत दुर्घटनेच्या 60 वर्षांनंतरही पुणेकरांवर आली ही आफत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:35 IST

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले.

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले. जवळपास सहा दशकांपूर्वी पानशेत धरण फुटल्याने पुण्याने विध्वंस पाहिला होता. या आठवणी ताज्या झाल्या. 

12 जुलै 1961 ला सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली होती. 1950 पर्यंत पुण्याला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होत होता. यावेळी आणखी पाण्याची गरज भासू लागली. म्हणून खडकवासल्याच्या वरच्या बाजुला मातीचे धरण बांधायचा निर्णय झाला. 1958 ला नवीन धरण बांधायचे काम सुरु करण्यात आले. मुठेची उपनदी अंबा नदीवर पानशेत हे धरण बांधणे सुरु झाले. पहिल्या टप्प्यात 6 आणि नंतरच्या टप्प्यात 11 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण 1962 पर्यंत बांधून पूर्ण केले जाणार होते. 

काम सुरु असताना काही ठिकाणी मातीवर दाब न दिला गेल्याने तेथील भाग कच्चा राहिला होता. तसेच धरणाचा दरवाजाही अर्धवट अवस्थेत होता. 1961 च्या जुनमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळू लागल्याने काम तशेच थांबविण्य़ात आले. मात्र, धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी साचू लागले. या पाण्याच्या दाब धरणावर येऊन 12 जुलैला धरण फुटले. 

पुराचे पाणी जोरात खालच्याबाजुला असलेल्या पुणे शहरात घुसले. यामध्ये आताच्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ आदी पेठांमध्ये पाणी घुसल्याने घरेच्या घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेने पुण्याचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. 

पानशेत धरणाला भेग गेल्याची बातमी पसरताच पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. प्रशासन घाबरून जाऊ नये, असे पोकळ धीर देत होते. ११ जुलैच्या रात्री भारतीय जवानांनी धरणाच्या गळतीच्या भागात मातीची पोती लावून धरण थोपवून धरले होते. मात्र, पाण्याचा दाब वाढल्याने ते ही हतबल झाले. रात्री पुणेकर झोपेत असताना धरण फुटले असते तर प्रचंड जिवीतहानी झाली असती. सकाळी पानशेत घरण फुटले. त्यांनतर काही काळाने खडकवासला धरणही फुटल्याने पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. 

आज मुठानदीवरील कालवा फुटल्याने या सहा दशकांपासून विस्मरणात गेलेल्या आठवणी ताज्या झाल्या. पुण्याचा विस्तार जसजसा वाढत गेला तसा धरणांवरील ताणही वाढताच आहे. दोन वर्षांपूर्वीही पानशेत धरणाला तडे गेले होते. मात्र, त्याची डागडुजी करण्यात आली होती. पानशेत धरणाबरोबरच पुण्यातील कालव्यांचीही दुर्दशा झाली आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाPuneपुणेfloodपूर