शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पानशेत दुर्घटनेच्या 60 वर्षांनंतरही पुणेकरांवर आली ही आफत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:35 IST

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले.

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले. जवळपास सहा दशकांपूर्वी पानशेत धरण फुटल्याने पुण्याने विध्वंस पाहिला होता. या आठवणी ताज्या झाल्या. 

12 जुलै 1961 ला सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली होती. 1950 पर्यंत पुण्याला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होत होता. यावेळी आणखी पाण्याची गरज भासू लागली. म्हणून खडकवासल्याच्या वरच्या बाजुला मातीचे धरण बांधायचा निर्णय झाला. 1958 ला नवीन धरण बांधायचे काम सुरु करण्यात आले. मुठेची उपनदी अंबा नदीवर पानशेत हे धरण बांधणे सुरु झाले. पहिल्या टप्प्यात 6 आणि नंतरच्या टप्प्यात 11 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण 1962 पर्यंत बांधून पूर्ण केले जाणार होते. 

काम सुरु असताना काही ठिकाणी मातीवर दाब न दिला गेल्याने तेथील भाग कच्चा राहिला होता. तसेच धरणाचा दरवाजाही अर्धवट अवस्थेत होता. 1961 च्या जुनमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळू लागल्याने काम तशेच थांबविण्य़ात आले. मात्र, धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी साचू लागले. या पाण्याच्या दाब धरणावर येऊन 12 जुलैला धरण फुटले. 

पुराचे पाणी जोरात खालच्याबाजुला असलेल्या पुणे शहरात घुसले. यामध्ये आताच्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ आदी पेठांमध्ये पाणी घुसल्याने घरेच्या घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेने पुण्याचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. 

पानशेत धरणाला भेग गेल्याची बातमी पसरताच पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. प्रशासन घाबरून जाऊ नये, असे पोकळ धीर देत होते. ११ जुलैच्या रात्री भारतीय जवानांनी धरणाच्या गळतीच्या भागात मातीची पोती लावून धरण थोपवून धरले होते. मात्र, पाण्याचा दाब वाढल्याने ते ही हतबल झाले. रात्री पुणेकर झोपेत असताना धरण फुटले असते तर प्रचंड जिवीतहानी झाली असती. सकाळी पानशेत घरण फुटले. त्यांनतर काही काळाने खडकवासला धरणही फुटल्याने पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. 

आज मुठानदीवरील कालवा फुटल्याने या सहा दशकांपासून विस्मरणात गेलेल्या आठवणी ताज्या झाल्या. पुण्याचा विस्तार जसजसा वाढत गेला तसा धरणांवरील ताणही वाढताच आहे. दोन वर्षांपूर्वीही पानशेत धरणाला तडे गेले होते. मात्र, त्याची डागडुजी करण्यात आली होती. पानशेत धरणाबरोबरच पुण्यातील कालव्यांचीही दुर्दशा झाली आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाPuneपुणेfloodपूर