शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पानशेत दुर्घटनेच्या 60 वर्षांनंतरही पुणेकरांवर आली ही आफत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:35 IST

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले.

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले. जवळपास सहा दशकांपूर्वी पानशेत धरण फुटल्याने पुण्याने विध्वंस पाहिला होता. या आठवणी ताज्या झाल्या. 

12 जुलै 1961 ला सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली होती. 1950 पर्यंत पुण्याला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होत होता. यावेळी आणखी पाण्याची गरज भासू लागली. म्हणून खडकवासल्याच्या वरच्या बाजुला मातीचे धरण बांधायचा निर्णय झाला. 1958 ला नवीन धरण बांधायचे काम सुरु करण्यात आले. मुठेची उपनदी अंबा नदीवर पानशेत हे धरण बांधणे सुरु झाले. पहिल्या टप्प्यात 6 आणि नंतरच्या टप्प्यात 11 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण 1962 पर्यंत बांधून पूर्ण केले जाणार होते. 

काम सुरु असताना काही ठिकाणी मातीवर दाब न दिला गेल्याने तेथील भाग कच्चा राहिला होता. तसेच धरणाचा दरवाजाही अर्धवट अवस्थेत होता. 1961 च्या जुनमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळू लागल्याने काम तशेच थांबविण्य़ात आले. मात्र, धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी साचू लागले. या पाण्याच्या दाब धरणावर येऊन 12 जुलैला धरण फुटले. 

पुराचे पाणी जोरात खालच्याबाजुला असलेल्या पुणे शहरात घुसले. यामध्ये आताच्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ आदी पेठांमध्ये पाणी घुसल्याने घरेच्या घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेने पुण्याचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. 

पानशेत धरणाला भेग गेल्याची बातमी पसरताच पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. प्रशासन घाबरून जाऊ नये, असे पोकळ धीर देत होते. ११ जुलैच्या रात्री भारतीय जवानांनी धरणाच्या गळतीच्या भागात मातीची पोती लावून धरण थोपवून धरले होते. मात्र, पाण्याचा दाब वाढल्याने ते ही हतबल झाले. रात्री पुणेकर झोपेत असताना धरण फुटले असते तर प्रचंड जिवीतहानी झाली असती. सकाळी पानशेत घरण फुटले. त्यांनतर काही काळाने खडकवासला धरणही फुटल्याने पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. 

आज मुठानदीवरील कालवा फुटल्याने या सहा दशकांपासून विस्मरणात गेलेल्या आठवणी ताज्या झाल्या. पुण्याचा विस्तार जसजसा वाढत गेला तसा धरणांवरील ताणही वाढताच आहे. दोन वर्षांपूर्वीही पानशेत धरणाला तडे गेले होते. मात्र, त्याची डागडुजी करण्यात आली होती. पानशेत धरणाबरोबरच पुण्यातील कालव्यांचीही दुर्दशा झाली आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाPuneपुणेfloodपूर