शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संगीतात साधनेशिवाय पर्याय नाही - आनंद भाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:28 IST

‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा आस्वाद रसिकांना घेता येत नाही. ते राग ऐकण्याची संधी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमधून रसिकांना मिळते, असे सांगून प्रसिद्ध ...

‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा आस्वाद रसिकांना घेता येत नाही. ते राग ऐकण्याची संधी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमधून रसिकांना मिळते, असे सांगून प्रसिद्ध युवागायक आनंद भाटे यांनी दिवाळी पहाटमध्ये एखाद्या संगीत नाटकाचा प्रयोग होण्यासही हरकत नाही, अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.दिवाळी म्हणजे दिवाळी पहाट हे समीकरण आज सर्वमान्य झाले आहे. पहाटेच्या मैफली तशा विशेष होत नसल्यामुळे पहाटेच्या मैफली हेच दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. बºयाच ठिकाणी एकाच वेळेला कार्यक्रम सुरू असतात. तरी सगळ्याच कार्यक्रमांना रसिकांची गर्दी असते. गेल्या चार वर्षांपासून ‘लोकमत’देखील ‘दिवाळी पहाट’करीत आहे ही कौतुकाची बाब आहे.‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘बालगंधर्व’च्याद्वारे संगीत वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. खूप जण येऊन सांगतात, की बालगंधर्वमुळे आपल्याला संगीताची इतकी मोठी परंपरा आहे हे कळले. यामुळे नाट्यसंगीतच नाही तर शास्त्रीय संगीतही ऐकायला लागलो. ‘बालगंधर्व’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतातील दोन माईलस्टोन ठरले आहेत.दिवाळी पहाटमध्ये संगीत नाटके फारशी होत नाहीत. कारण नाटके ही रात्रीच होण्याची परंपरा आहे. परंतु नाट्य आणि शास्त्रीय संगीताचेकार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. दिवाळी पहाटला संगीत नाटकाचा एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. इतर ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत. पूर्वीपासून संगीताच्या प्रवाहात अनेक बदल झाले आहेत. पंडित भीमसेन जोशी यांनीदेखील संगीतात सूक्ष्म बदल केले. मात्र संगीताच्या गाभ्याला धक्का लावला नाही. नवीन काहीतरी करायचे, म्हणून परंपरा सोडून दिली तर ते योग्य ठरणार नाही. परंपरा जपून नवीन पद्धतीने सादरीकरण करण्यास कोणतीच हरकत नाही.रागाचा गाभा तोच ठेवून नवीन वाद्यांमधून जर त्याचे सादरीकरण होत असेल तर नव आविष्काराचा अनुभव मिळतो. त्यामुळे फ्यूजन हा प्रकार चांगला की वाईट यापेक्षा तो सादर कसा केला जातो, याला जास्त महत्त्व असल्याचे ते सांगतात. हल्लीची जीवनशैली ही जलद बनली आहे. गायक आणि रसिकांच्या ऐकण्याची सहनशीलता कमी होत चालली आहे. एखादा राग पूर्वी दीड दीड तास गायला जायचा. तो आज सर्वसामान्य मैफलीमध्ये दिसत नाही.यापुढील काळात शास्त्रीय मैफलीमध्ये हे राग सादर होत राहतील. पण छोट्या मैफलींमध्ये हे प्रमाण खूप कमी राहील. राग तीस मिनिटांमध्येसुद्धा अशा पद्धतीने सादर केला जाऊ शकतो. त्यातून मैफलीचा पूर्ण आनंद मिळू शकेल.पंडित भीमसेन जोशींनी हे प्रयोग केले होते. त्यांनी मैफलीत दीड दीड तास राग गायले आणि त्याबरोबरीने रेकॉर्डिंगदेखील वीस ते तीस मिनिटांचे केले. कलाकारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की तीस मिनिटांमध्ये राग सादर करताना पूर्ण गाभा त्यात आला पाहिजे. त्यामुळे ही कलाकारांची मोठी जबाबदारी आहे. रिअ‍ॅलिटी शोकडे आपण कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. याचे फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. अशा शोमुळे व्यासपीठ मिळते. कलाकार, मुले आणि पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे, हे आपले अंतिम ध्येय आहे. संगीतक्षेत्रात करिअरकरायचे असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :musicसंगीतPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र