शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं एकतावादीच्या कार्यकर्त्याचा खून

By admin | Updated: December 17, 2014 03:11 IST

आधी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर ती मागे घेण्यावरून रिपाइं एकतावादीचे कळवा विभाग कार्याध्यक्ष भास्कर कदम यांची मंगळवारी पहाटे २ वा

ठाणे : आधी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर ती मागे घेण्यावरून रिपाइं एकतावादीचे कळवा विभाग कार्याध्यक्ष भास्कर कदम यांची मंगळवारी पहाटे २ वा. सुमारास हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने घोलाईनगर परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.कदम यांनी शंकर शिंदे याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ती मागे घेण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. याच तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस त्याचा शोध घेत घोलाईनगरात पोहचले. त्यांना पाहून शंकर पसार झाला. मात्र पोलीस गेल्यानंतर त्याने पुन्हा कदम यांना गाठून त्यांच्यावर पहाटे आपल्या साथीदारांच्या मदतीने चॉपरने हल्ला केला. त्यावेळी कदम यांना वाचिवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश सोनावणे, अतुल भंडारे, किरण साठे आणि भास्कर यांची पत्नी सायली हे चौघेजण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेले भास्कर यांचा मात्र जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जखमींवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. भगवान कांबळे (५५ रा. घोलाईनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला २० डिसेंबर २०१४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अन्य चौघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांनी दिली. शंकर याच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यातही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर कळवा आणि घोलाईनगर परिसरातील दुकाने मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)