शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका झाल्या, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का? काँग्रेस, ठाकरे बंधूंबाबत नाराजीचा सूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:13 IST

Municipal Election 2026: उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपापल्या पक्षाच्या पराभूतांची साधी विचारपूस केली नाही, असे म्हटले जात आहे.

Municipal Election 2026: विधानसभा, नगर पालिका अन् आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजयी असल्याचे सिद्ध केले. भाजपाने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजपा-शिंदेसेना युतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला असून जवळपास सर्वच ठिकाणी भाजपाच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्या आहेत. उद्धवसेना, शरद पवार गटाचे अस्तित्वच राहिले नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मुंबईतील सत्ता राखू शकलेले नाहीत. हा दोन्ही ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. यानंतर आता काँग्रेस, उद्धवसेना, मनसे यांनी कार्यकर्ते, पराभूत उमेदवारांकडे पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जाते आहे.

नवी मुंबई निवडणुकीत महापालिकेच्या पक्ष कोणताही असो, सतत २० वर्षे नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्यावर विश्वास दाखविला आहे. यावेळी तर १११ पैकी ६५ नगरसेवक निवडून एकहाती सत्ता सोपविली. यापूर्वी सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी नाईकांना इतरांच्या कुबड्यांची गरज भासत होती. कधी काँग्रेस तर कधी अपक्षांची मदत घेऊन आपणच नवी मुंबईचे दादा आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईचे कसे नुकसान केले, हा मुद्दा त्यांनी प्रचारात मांडला. सत्ता पुन्हा हाती दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपण हे सर्व थांबवू, असे आश्वासन दिले. ते लोकांना भावले. आता एकहाती सत्ता आल्याने महापालिकाच नव्हे तर सिडकोसह एमआयडीसीत नाईक काय करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असेल. यातच पराभूत झालेल्या उमेदवारांकडे काँग्रेस, ठाकरे बंधूंनी सपशेल दुर्लक्ष केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत झालेला पराभव तुमचा एकट्याचा नसून, तो सर्वांचा असल्याचे सांगून त्यांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही भाजपसह शिंदेसेनेने आपल्या पराभूत उमेदवारांना दिली. एवढेच नव्हे तर खा. नरेश म्हस्के यांनी शिंदेसेनेच्या सर्व पराभूतांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पराभव झाला तरी पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगितले. तसेच माजी खा. संजीव नाईक यांनी पराभूतांच्या भेटी घेऊन त्यांचा उत्साह वाढविला. मात्र, दुसरीकडे उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपापल्या पक्षाच्या पराभूतांची साधी विचारपूस केली नाही. उद्धव ठाकरेंनी केवळ विजेत्यांनाच बोलावले. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का? असा सूर उमटत आहे.

दरम्यान, नवी मुंबईत सर्वांना सोबत घेऊन चालणारे गणेश नाईकांचे राजकारणच चालते, इथे धनसंपत्ती वा बलप्रयोगाला थारा नाही, हे नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. गणेश नाईकांनी भाजपाच्या बळावर कधी नव्हे इतके निर्विवाद वर्चस्व मिळविले. नवी मुंबईतून गणेश नाईकांचा टांगा पलटी करूनच दाखवेल, या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आव्हानानंतर पेटून उठलेल्या गणेश नाईकांनी शहर अक्षरशः पिंजून आपणच नवी मुंबईचे 'ठाणे'दार असल्याचे दाखवून दिले. निवडणूक प्रचारातही शिंदे-नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू असल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Post-Election Neglect? Congress, Thackeray Brothers Face Worker Discontent

Web Summary : After municipal elections, Congress and Thackeray brothers face criticism for allegedly neglecting workers and defeated candidates. Ganesh Naik's dominance in Navi Mumbai continues, while BJP leaders support their losing candidates.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाNavi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसBJPभाजपा