शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील घरे स्वस्त होणे अशक्य !

By admin | Updated: March 30, 2015 02:48 IST

नव्या प्रस्तावित विकास आराखड्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने घरे स्वस्त होतील, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून केला जात

संदिप प्रधान, मुंबईनव्या प्रस्तावित विकास आराखड्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने घरे स्वस्त होतील, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ते अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रस्तावित विकास आराखड्याविषयी महापालिका आयुक्तांनी सादरीकरण केले. मात्र रेडी रेकनरच्या दराच्या ७५ टक्के आणि १०० टक्के प्रिमीयमची रक्कम भरून एफएसआय खरेदी करण्याची असलेली तरतूद आणि बाजारातून विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) खरेदी करून वापरण्याची मुभा यामुळे यापुढे बृहन्मुंबईत सरसकट ५० मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती उभ्या राहतील व त्या इमारतींमधील घरे स्वस्त असणार नाहीत, असे मत शिवसेनेच्या आमदारांनी सादरीकरणा दरम्यान नोंदवले.सध्या मुंबईतील दरडोई वापरले गेलेले बांधीव क्षेत्र सरासरी ९ चौ.मी. आहे. २०३४ सालापर्यंत आर्थिक संपन्नतेमुळे हे दरडोई वापरले गेलेले बांधीव क्षेत्र सरासरी २७ चौ.मी. असेल, असा विकास आराखड्यातील अंदाज आहे. ४५८ चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या बृहन्मुंबईतील १४० चौ.कि.मी. जमिनीचाच केवळ बांधकामाकरिता वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे १ कोटी ४० लाख अंदाजित लोकसंख्येकरिता ४४० चौ.कि.मी. बांधीव क्षेत्राची गरज असेल. त्यामुळे आकाशाला गवसणी घालणारे टॉवर बांधणे अपरिहार्य असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. याकरिता सरसकट बृहन्मुंबईत ३.१५ एवढा एफएसआय देणे गरजेचे आहे. बेकायदा बांधकामांची कबुलीबृहन्मुंबईचा पहिला विकास आराखडा १९६६-६७ साली दहा वर्षांकरिता तयार केला गेला. त्यानंतर दुसरा विकास आराखडा १९७६ मध्ये अमलात यायला हवा होता. मात्र विकास आराखड्याचे प्रारुप १९८४ साली प्रसिद्ध झाले. लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यास १९८९ साल उजाडले. सरकारने १९९१ ते ९४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने या विकास आराखड्याला मंजुरी दिली गेली. याचा अर्थ तब्बल १५ वर्षे देशाच्या आर्थिक राजधानीला विकास आराखडा नव्हता. १९९१ च्या या विकास आराखड्यातील केवळ ३५ टक्के आरक्षणे अमलात आली. उर्वरित ६५ टक्के आरक्षणे आता नव्या आराखड्यात रद्द केली आहेत. आता या जमिनीवर झोपड्या व बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची कबुली आराखड्यात दिलेली आहे.मोकळ््या जागांचे दिवास्वप्नबृहन्मुंबईतील दरडोई मोकळी जागा १.०९ चौ.मी. आहे. देशाच्या राजधानीत ती ४.५ चौ.मी. आहे. प्रस्तावित विकास आराखड्यात ती २ चौ.मी. करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. याकरिता १४ चौ.कि.मी. अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध करावी लागेल. पर्यावरणवाद्यांनी मुंबईत दरडोई ६ चौ.मी. मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला आहे. ही मागणी स्वीकारायची झाली तर बांधकामास उपलब्ध १४० चौ.कि.मी. जमिनीपैकी ५६ चौ.कि.मी. जमीन मोकळी ठेवावी लागेल. एवढ्या मोठ्या जमिनीवरील ५८ लाख लोकांचे पुनर्वसन करणे अशक्य असल्याचे महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी सांगितले.