शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

राज्याच्या जडणघडणीत मुंबईचे योगदान मोठे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:07 AM

नवीन, बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे; राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यामध्ये मुंबईचे मोठे योगदान आहे. बहुसंख्य बँका, उद्योग समूह आणि वित्तीय संस्थांची मुख्यालये मुंबईत आहेत. देशाचा सर्वांत मोठा शेअर बाजार आणि जगप्रसिद्ध चित्रपट नगरी याच शहरात आहे. मुंबई भारताच्या महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असून येथून मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार चालतो. औद्योगिक उत्पादने, आर्थिक आणि सेवा क्षेत्राचे हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे, असा मुंबईचा गौरव करत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र हे देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून ते देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगताना राज्यपालांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८व्या वर्धापन दिनी नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा बुधवारी शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांच्यासह राज्य शासन आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे कौन्सुलेट जनरल आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान व वाहन उद्योगनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून पुणे शहर उदयास आले आहे. नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरेदेखील विकासाची शक्तिकेंद्रे आहेत.

या वेळी सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल, निशाण टोळी, मुंबई लोहमार्ग पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, महापालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, ब्रास बँड पथक, पाइप बँड पथक आदी दलांनी संचलन केले. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले. अग्निशमन दलाचे हॅजमेट वाहन, फोम टेंडर वाहन, मिनी फोम टेंडर वाहन आदींनी संचलनात सहभाग घेतला. यानंतर राज्यपाल राव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी क्रीडा भवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिन