शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 14:51 IST

एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाअंतर्गत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज भरला आहे.

ठळक मुद्देएमपीएससीकडे विद्यार्थ्यांची मागणी ;  वयोमर्यादा वाढवा.. 

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाअंतर्गत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून (एसीईबीसी) अर्ज भरला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस ) अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी. तसेच कोरोना व इतर कारणांमुळे वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे. त्यामुळे राज्य शासनाने विविध परीक्षांच्या वयोमर्यादेत वाढ करावी ,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.   सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला बुधवारी स्थगिती दिली.तसेच घटनापीठकडे मी याबाबत पुढील सुनावणी होणार आहे. मात्र , एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी एसईबीसीतून अर्ज भरला आहे. या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आपला अर्ज कोणत्या संवर्गासाठी गृहीत धरला जाईल, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी खुल्या संवर्गाऐवजी आम्हाला ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज भरण्यास संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.    मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे एमपीएससीने विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पद भरती केली जाईल,असा उल्लेख केला होता. त्यामुळे यापूर्वी नियुक्त झालेल्या उमेदवारांमध्ये सुध्दा काहीसे भीतीचे वातावरण आहे, असेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी सांगत आहेत.   एमपीएससीने कोरोनासह इतर कारणामुळे परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, काही विद्यार्थ्यांनी संबंधित पदांसाठी निश्चित केलेली वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यसेवा परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा आदी पदांच्या परीक्षेसाठी आयोगाने निश्चित केलेली वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागेल ,अशी संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली.-------------------मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असून राज्य शासनाने याबाबत केंद्र  शासनावर दबाव आणणे  गरजेचे आहे. तसेच यापूर्वी एसईबीसीमधून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमधून अर्ज भरण्याची संधी द्यावी.- अनुप देशमुख, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी----------------पूर्वी मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज भरण्याची संधी उपलब्ध नव्हती. आता आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी संधी द्यावी.तसेच विविध परीक्षांची वयोमर्यादा वाढवावी.- उमेश घोग'रे ,स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षा