शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
9
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
10
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
11
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
12
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
13
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
14
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
15
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
16
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
17
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
18
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
19
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
20
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

'राज्यातल्या एकाही नेत्याला केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही'; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:04 IST

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

शिबिर हे लढण्याचे शिबिर आहे. ही रुदाली नाही. का झालं कशामुळे झालं? हे सांगण्याचे हे शिबिर नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही होती. भले-मोठे मोठे सरदार, पराक्रमी, वतनदार होते, तलवारीला प्रत्येकाच्या धार होती. मनगटात प्रत्येकाची ताकद होती, पण माना मात्र मुघलशाही, आदिलशाहीसमोर झोपलेल्या होत्या कारण प्रत्येकाला आपली वतने वाचवायची होती, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

वेदांता, फॉक्सकॉन, डायमंड बोस, पाणबुडी, महानंदा हे प्रकल्प गेलेत; कांद्याची निर्यात बंदी झाली. मात्र आमच्या ताटातलं का हीसाकाऊन घेत आहात? असं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही. लाचारीने मान जर झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिंमत उरत नाही, अशी टीका अमोल कोल्हेंनी यावेळी केली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

माध्यमांमधून आपण ऐकत असतो कोणीतरी हिंदुत्वासाठी, कुणीतरी विकासासाठी; प्रत्येकाचा आपापला वर्जन हा ठरलेला असतो आणि त्याचा आपण आदरही करू, पण महाराष्ट्रात जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं, तर शिवाजी महाराजांना आपण दख्खनची सुभेदारी देऊ; हा दख्खनचा जो सुबा होता हा दख्खनचा सुबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट होता, कितीतरी पटीने ऐश्वर्या संपन्न होता. कितीतरी पटीने आकाराने मोठा होता, संघर्षाची गरज नव्हती, मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती, ऐशो आरामाचे, सुखाचे जीवन होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करले नाही त्यांनी तत्त्वांसाठी लढणे पत्करलं आणि म्हणूनच साडेतीनशे वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्या वाटेने आपण आता चाललेलो आहोत, असं अमोल कोल्हे म्हणाले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार