शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

'राज्यातल्या एकाही नेत्याला केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही'; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:04 IST

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

शिबिर हे लढण्याचे शिबिर आहे. ही रुदाली नाही. का झालं कशामुळे झालं? हे सांगण्याचे हे शिबिर नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही होती. भले-मोठे मोठे सरदार, पराक्रमी, वतनदार होते, तलवारीला प्रत्येकाच्या धार होती. मनगटात प्रत्येकाची ताकद होती, पण माना मात्र मुघलशाही, आदिलशाहीसमोर झोपलेल्या होत्या कारण प्रत्येकाला आपली वतने वाचवायची होती, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

वेदांता, फॉक्सकॉन, डायमंड बोस, पाणबुडी, महानंदा हे प्रकल्प गेलेत; कांद्याची निर्यात बंदी झाली. मात्र आमच्या ताटातलं का हीसाकाऊन घेत आहात? असं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही. लाचारीने मान जर झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिंमत उरत नाही, अशी टीका अमोल कोल्हेंनी यावेळी केली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

माध्यमांमधून आपण ऐकत असतो कोणीतरी हिंदुत्वासाठी, कुणीतरी विकासासाठी; प्रत्येकाचा आपापला वर्जन हा ठरलेला असतो आणि त्याचा आपण आदरही करू, पण महाराष्ट्रात जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं, तर शिवाजी महाराजांना आपण दख्खनची सुभेदारी देऊ; हा दख्खनचा जो सुबा होता हा दख्खनचा सुबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट होता, कितीतरी पटीने ऐश्वर्या संपन्न होता. कितीतरी पटीने आकाराने मोठा होता, संघर्षाची गरज नव्हती, मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती, ऐशो आरामाचे, सुखाचे जीवन होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करले नाही त्यांनी तत्त्वांसाठी लढणे पत्करलं आणि म्हणूनच साडेतीनशे वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्या वाटेने आपण आता चाललेलो आहोत, असं अमोल कोल्हे म्हणाले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार