शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'राज्यातल्या एकाही नेत्याला केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही'; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:04 IST

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

शिबिर हे लढण्याचे शिबिर आहे. ही रुदाली नाही. का झालं कशामुळे झालं? हे सांगण्याचे हे शिबिर नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही होती. भले-मोठे मोठे सरदार, पराक्रमी, वतनदार होते, तलवारीला प्रत्येकाच्या धार होती. मनगटात प्रत्येकाची ताकद होती, पण माना मात्र मुघलशाही, आदिलशाहीसमोर झोपलेल्या होत्या कारण प्रत्येकाला आपली वतने वाचवायची होती, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

वेदांता, फॉक्सकॉन, डायमंड बोस, पाणबुडी, महानंदा हे प्रकल्प गेलेत; कांद्याची निर्यात बंदी झाली. मात्र आमच्या ताटातलं का हीसाकाऊन घेत आहात? असं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही. लाचारीने मान जर झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिंमत उरत नाही, अशी टीका अमोल कोल्हेंनी यावेळी केली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

माध्यमांमधून आपण ऐकत असतो कोणीतरी हिंदुत्वासाठी, कुणीतरी विकासासाठी; प्रत्येकाचा आपापला वर्जन हा ठरलेला असतो आणि त्याचा आपण आदरही करू, पण महाराष्ट्रात जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं, तर शिवाजी महाराजांना आपण दख्खनची सुभेदारी देऊ; हा दख्खनचा जो सुबा होता हा दख्खनचा सुबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट होता, कितीतरी पटीने ऐश्वर्या संपन्न होता. कितीतरी पटीने आकाराने मोठा होता, संघर्षाची गरज नव्हती, मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती, ऐशो आरामाचे, सुखाचे जीवन होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करले नाही त्यांनी तत्त्वांसाठी लढणे पत्करलं आणि म्हणूनच साडेतीनशे वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्या वाटेने आपण आता चाललेलो आहोत, असं अमोल कोल्हे म्हणाले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार