शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

'नागपुरात दर दोन दिवसाला बलात्कार; अरे सांगा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 4:38 PM

नागपूर आता गुन्हेगारींची राजधानी बनली आहे.

मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ पुन्हा सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेतून भाजप-शिवसेनेवर टीका करताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी जिंतूर येथील सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात चार दिवसात एक खून आणि दोन दिवसात एक बलात्काराची घटना घडत आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी सांगावे की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. असा टोला खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने केलेली ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात चांगलीच गाजली होती. आघाडी सरकारच्या कारभारावर या जाहिरातीतून कोरडे ओढण्यात आले होते. यावरूनच आता खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरात चार दिवसाला एक खून, दोन दिवसात एक बलात्कार आणि दररोज एक अपहरणाची घटना घडत आहे. नागपूर आता गुन्हेगारींची राजधानी बनली आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी सांगावा की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा शब्दात खासदार कोल्हेंनी भाजप सराकरवर शरसंधान साधले.

एकीकडे मुख्यमंत्री सांगतात शेतकरी कर्जमाफी करणार, तर दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री म्हणतात कर्जमाफी करणे शक्य नाही. रांगेत उभे राहून पाये दुखले पण अजूनही शेतकऱ्यांच्या हातात ही कर्जमाफी आली नसल्याचा आरोप कोल्हे यांनी यावेळी केला. पीक विम्याच्या नावाने १६ ह्जार कोटींचा निव्वळ नफा खाजगी कंपनांच्या घशात घालण्यात आल्याचा दावा सुद्धा कोल्हे यांनी केला आहे.