शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:43 IST

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर: जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिले आहेत. दरम्यान, ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्याचा साखर हंगाम संपला असून सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखाने फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान बंद झाले आहेत. थकबाकीदार साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची आरआरसीनुसार साखर जप्ती करून शेतकºयांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी काढले. यामध्ये संत कूर्मदास साखर कारखान्याकडे १२ कोटी २२ लाख ६९ हजार, बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरीकडे १९ कोटी ६० लाख ४३ हजार, विठ्ठल रिफायनरीज पांडे (करमाळा) या कारखान्याकडे २६ कोटी ७१ लाख ३१ हजार तर जयहिंद शुगरकडे १६ कोटी २४ लाख ४० हजार रुपये, याप्रमाणे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये शेतकºयांची देणेबाकी आहे. 

जानेवारीमध्ये साखर आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीनंतर ३१ जानेवारीला काढलेल्या आरआरसीच्या कारवाईमध्ये जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांचा समावेश होता. ही कारवाई तहसील कार्यालयाकडून थांबली असतानाच  साखर कारखान्यांनी शेतकºयांचे काही पैसे दिले आहेत. जे कारखाने सुनावणीच्या दिवशी थकबाकीत आहेत अशाच कारखान्यांवर पुन्हा आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून  सांगण्यात आले.

 फेब्रुवारी-मार्च महिन्यात गाळप बंद झाल्यानंतर आतापर्यंत शेतकºयांना उसाचे पैसे देणे बंधनकारक होते; मात्र ३० एप्रिलच्या माहितीनुसार जिल्ह्यातील गोकुळ माऊली या एकमेव साखर कारखान्याने एफआरपीनुसार  संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. अन्य ३० साखर कारखान्यांनी अद्यापही ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे दिले नसल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

‘विठ्ठलराव शिंदे’कडे सर्वाधिक थकबाकी- ३० एप्रिलअखेर विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे ७४ कोटी ४० लाख,विठ्ठल गुरसाळे कारखान्याकडे ७२ कोटी १८ लाख, लोकनेते अनगरकडे ५८ कोटी ५७ लाख,गोकुळकडे ५३ कोटी १५ लाख, विठ्ठल रिफायनरीज पांडेकडे ५३ कोटी ८३ लाख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याकडे ५४ कोटी ७ लाख, सिद्धेश्वर कारखान्याकडे ४९ कोटी २३ लाख,  लोकमंगल शुगरकडे ४६ कोटी ६८ लाख, बबनराव शिंदे तुर्कपिंपरीकडे ४४ कोटी १५ लाख,  पांडुरंगकडे ४२ कोटी २१ लाख, जकरायाकडे ३८ कोटी ७० लाख, जयहिंदकडे ३७ कोटी २३ लाख, सिद्धनाथ शुगर ३४ कोटी ६९ लाख.

जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याच्या सूचना आमच्या विशेष लेखापरीक्षकांना दिल्या आहेत. ही माहिती दिल्यानंतर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे महसूल खात्याला सोयीचे होणार आहे.-अविनाश देशमुख,साखर सहसंचालक, सोलापूर 

च्मातोश्री लक्ष्मी शुगरकडे ३२ कोटी ५२ लाख, भैरवनाथ आलेगावकडे ३० कोटी ६९ लाख, युटोपियनकडे २७ कोटी ८० लाख, सासवड माळीशुगरकडे २७ कोटी २१ लाख, भीमा टाकळी सिकंदरकडे २६ कोटी ८९ लाख, श्री मकाईकडे २२ कोटी १० लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळकडे १७ कोटी ९५ लाख,  भैरवनाथ विहाळकडे १६ कोटी ५३ लाख, फॅबटेककडे १५ कोटी ५५ लाख, आदिनाथकडे १४ कोटी ७१ लाख, भैरवनाथ लवंगीकडे १४ कोटी ४४ लाख,सहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटी ५३ लाख, कूर्मदासकडे १२ कोटी २३ लाख,  संत दामाजी कारखान्याकडे १० कोटी ८० लाख, सीताराम महाराजकडे १० कोटी ५७ लाख, इंद्रेश्वरकडे ७ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे थकबाकी असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाने सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती