शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:43 IST

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर: जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिले आहेत. दरम्यान, ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्याचा साखर हंगाम संपला असून सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखाने फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान बंद झाले आहेत. थकबाकीदार साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची आरआरसीनुसार साखर जप्ती करून शेतकºयांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी काढले. यामध्ये संत कूर्मदास साखर कारखान्याकडे १२ कोटी २२ लाख ६९ हजार, बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरीकडे १९ कोटी ६० लाख ४३ हजार, विठ्ठल रिफायनरीज पांडे (करमाळा) या कारखान्याकडे २६ कोटी ७१ लाख ३१ हजार तर जयहिंद शुगरकडे १६ कोटी २४ लाख ४० हजार रुपये, याप्रमाणे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये शेतकºयांची देणेबाकी आहे. 

जानेवारीमध्ये साखर आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीनंतर ३१ जानेवारीला काढलेल्या आरआरसीच्या कारवाईमध्ये जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांचा समावेश होता. ही कारवाई तहसील कार्यालयाकडून थांबली असतानाच  साखर कारखान्यांनी शेतकºयांचे काही पैसे दिले आहेत. जे कारखाने सुनावणीच्या दिवशी थकबाकीत आहेत अशाच कारखान्यांवर पुन्हा आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून  सांगण्यात आले.

 फेब्रुवारी-मार्च महिन्यात गाळप बंद झाल्यानंतर आतापर्यंत शेतकºयांना उसाचे पैसे देणे बंधनकारक होते; मात्र ३० एप्रिलच्या माहितीनुसार जिल्ह्यातील गोकुळ माऊली या एकमेव साखर कारखान्याने एफआरपीनुसार  संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. अन्य ३० साखर कारखान्यांनी अद्यापही ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे दिले नसल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

‘विठ्ठलराव शिंदे’कडे सर्वाधिक थकबाकी- ३० एप्रिलअखेर विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे ७४ कोटी ४० लाख,विठ्ठल गुरसाळे कारखान्याकडे ७२ कोटी १८ लाख, लोकनेते अनगरकडे ५८ कोटी ५७ लाख,गोकुळकडे ५३ कोटी १५ लाख, विठ्ठल रिफायनरीज पांडेकडे ५३ कोटी ८३ लाख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याकडे ५४ कोटी ७ लाख, सिद्धेश्वर कारखान्याकडे ४९ कोटी २३ लाख,  लोकमंगल शुगरकडे ४६ कोटी ६८ लाख, बबनराव शिंदे तुर्कपिंपरीकडे ४४ कोटी १५ लाख,  पांडुरंगकडे ४२ कोटी २१ लाख, जकरायाकडे ३८ कोटी ७० लाख, जयहिंदकडे ३७ कोटी २३ लाख, सिद्धनाथ शुगर ३४ कोटी ६९ लाख.

जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याच्या सूचना आमच्या विशेष लेखापरीक्षकांना दिल्या आहेत. ही माहिती दिल्यानंतर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे महसूल खात्याला सोयीचे होणार आहे.-अविनाश देशमुख,साखर सहसंचालक, सोलापूर 

च्मातोश्री लक्ष्मी शुगरकडे ३२ कोटी ५२ लाख, भैरवनाथ आलेगावकडे ३० कोटी ६९ लाख, युटोपियनकडे २७ कोटी ८० लाख, सासवड माळीशुगरकडे २७ कोटी २१ लाख, भीमा टाकळी सिकंदरकडे २६ कोटी ८९ लाख, श्री मकाईकडे २२ कोटी १० लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळकडे १७ कोटी ९५ लाख,  भैरवनाथ विहाळकडे १६ कोटी ५३ लाख, फॅबटेककडे १५ कोटी ५५ लाख, आदिनाथकडे १४ कोटी ७१ लाख, भैरवनाथ लवंगीकडे १४ कोटी ४४ लाख,सहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटी ५३ लाख, कूर्मदासकडे १२ कोटी २३ लाख,  संत दामाजी कारखान्याकडे १० कोटी ८० लाख, सीताराम महाराजकडे १० कोटी ५७ लाख, इंद्रेश्वरकडे ७ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे थकबाकी असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाने सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती