शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:43 IST

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर: जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिले आहेत. दरम्यान, ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्याचा साखर हंगाम संपला असून सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखाने फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान बंद झाले आहेत. थकबाकीदार साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची आरआरसीनुसार साखर जप्ती करून शेतकºयांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी काढले. यामध्ये संत कूर्मदास साखर कारखान्याकडे १२ कोटी २२ लाख ६९ हजार, बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरीकडे १९ कोटी ६० लाख ४३ हजार, विठ्ठल रिफायनरीज पांडे (करमाळा) या कारखान्याकडे २६ कोटी ७१ लाख ३१ हजार तर जयहिंद शुगरकडे १६ कोटी २४ लाख ४० हजार रुपये, याप्रमाणे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये शेतकºयांची देणेबाकी आहे. 

जानेवारीमध्ये साखर आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीनंतर ३१ जानेवारीला काढलेल्या आरआरसीच्या कारवाईमध्ये जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांचा समावेश होता. ही कारवाई तहसील कार्यालयाकडून थांबली असतानाच  साखर कारखान्यांनी शेतकºयांचे काही पैसे दिले आहेत. जे कारखाने सुनावणीच्या दिवशी थकबाकीत आहेत अशाच कारखान्यांवर पुन्हा आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून  सांगण्यात आले.

 फेब्रुवारी-मार्च महिन्यात गाळप बंद झाल्यानंतर आतापर्यंत शेतकºयांना उसाचे पैसे देणे बंधनकारक होते; मात्र ३० एप्रिलच्या माहितीनुसार जिल्ह्यातील गोकुळ माऊली या एकमेव साखर कारखान्याने एफआरपीनुसार  संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. अन्य ३० साखर कारखान्यांनी अद्यापही ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे दिले नसल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

‘विठ्ठलराव शिंदे’कडे सर्वाधिक थकबाकी- ३० एप्रिलअखेर विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे ७४ कोटी ४० लाख,विठ्ठल गुरसाळे कारखान्याकडे ७२ कोटी १८ लाख, लोकनेते अनगरकडे ५८ कोटी ५७ लाख,गोकुळकडे ५३ कोटी १५ लाख, विठ्ठल रिफायनरीज पांडेकडे ५३ कोटी ८३ लाख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याकडे ५४ कोटी ७ लाख, सिद्धेश्वर कारखान्याकडे ४९ कोटी २३ लाख,  लोकमंगल शुगरकडे ४६ कोटी ६८ लाख, बबनराव शिंदे तुर्कपिंपरीकडे ४४ कोटी १५ लाख,  पांडुरंगकडे ४२ कोटी २१ लाख, जकरायाकडे ३८ कोटी ७० लाख, जयहिंदकडे ३७ कोटी २३ लाख, सिद्धनाथ शुगर ३४ कोटी ६९ लाख.

जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याच्या सूचना आमच्या विशेष लेखापरीक्षकांना दिल्या आहेत. ही माहिती दिल्यानंतर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे महसूल खात्याला सोयीचे होणार आहे.-अविनाश देशमुख,साखर सहसंचालक, सोलापूर 

च्मातोश्री लक्ष्मी शुगरकडे ३२ कोटी ५२ लाख, भैरवनाथ आलेगावकडे ३० कोटी ६९ लाख, युटोपियनकडे २७ कोटी ८० लाख, सासवड माळीशुगरकडे २७ कोटी २१ लाख, भीमा टाकळी सिकंदरकडे २६ कोटी ८९ लाख, श्री मकाईकडे २२ कोटी १० लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळकडे १७ कोटी ९५ लाख,  भैरवनाथ विहाळकडे १६ कोटी ५३ लाख, फॅबटेककडे १५ कोटी ५५ लाख, आदिनाथकडे १४ कोटी ७१ लाख, भैरवनाथ लवंगीकडे १४ कोटी ४४ लाख,सहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटी ५३ लाख, कूर्मदासकडे १२ कोटी २३ लाख,  संत दामाजी कारखान्याकडे १० कोटी ८० लाख, सीताराम महाराजकडे १० कोटी ५७ लाख, इंद्रेश्वरकडे ७ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे थकबाकी असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाने सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती