शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 06:49 IST

Devendra Fadnavis Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या ताठर भूमिकेनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक घडवून आणलेल्या शपथविधीमुळे खळबळ उडाली होती. मात्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार अवघ्या काही तासांतच कोसळून अजित पवार माघारी गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली होती. दरम्यान, त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तेव्हाच्या घडामोडींबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या मुलाखतीमध्ये २०१९ च्या त्या घडामोडींबाबत सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांची मिस्ट्री समजून घ्यायची असले तर त्यांच्यां हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. तेव्हाच तुम्ही ही मिस्ट्री समजू शकता. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेलं नातं तोडून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. तसेच जसजशी ही बोलणी पुढे सरकू लागली तेव्हा उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत येणार नाहीत, त्यांना खुर्चीची ओढ लागली आहे, याची जाणीव आम्हाला झाली. त्या काळात ते आमचा फोनही उचलत नव्हते. त्यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे काय पर्याय आहेत, याची चाचपणी आम्ही सुरू केली. 

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत येऊ शकते. आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ इच्छितो, असे सांगितले. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन केलं जाईल, तसेच ते सरकार कसं स्थापन केलं जाईल, याबाबत आराखडा ठरवला गेला. अजित पवार आणि मी, आम्ही दोघे मिळून त्यासाठी पुढाकार घेऊ हेही ठरलं. आम्हा दोघांना सर्वाधिकार दिले गेले. त्याप्रमाणे आम्ही सर्व तयारी केली. मात्र सर्व तयारी झाल्यानंतर शरद पवार यांनी ऐनवेळी त्यातून माघार घेतली. आमचा शपथविधी होण्यापूर्वी तीन-चार दिवस आधी हे घडलं, असा दावा फडणवीस यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, त्यानंतर माझ्यासोबत येण्याशिवाय अजित पवार यांच्याकडे काही पर्याय नव्हता. कारण आम्ही सर्व तयारी पूर्ण केली होती. तसं केलं नसतं तर त्यांची अडचण झाली असती. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. एवढ्या सगळ्या बैठका झाल्या आहेत. स्वत: शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे. सर्व गोष्टी ठरल्या आहे. सर्व आमदार येतील. शरद पवार हेसुद्धा येतील, असं अजित पवार यांना वाटत होतं. मात्र शरद पवार आले नाहीत. त्यानंतर कोर्टात जे काही झालं ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आम्हाल सरकार सोडावं लागलं. मात्र मी वारंवार सांगतोय की, तेव्हा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, त्याची सुरुवात शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच केली होती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेली ती दगाबाजी होती. त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, असं म्हणता येईल. शरद पवार  आमच्यासोबत निवडून आलेले नव्हते. त्यांनी आमचा वापर करून घेतला, रणनीती आखली आणि एकप्रकारे आमची दिशाभूल करून निघून गेले. याला तुम्ही एकप्रकारचा डबलगेम म्हणू शकता. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

अजित पवार आणि मी पहाटे अचानक उठून शपथविधीला गेलो नव्हतो. जे आधी ठरलं होतं. आम्हा दोघांवर जबाबादारी सोपवण्यात आली होती. त्यानुसारच तो शपथविधी घडला होता. मात्र नंतर सर्व गोष्टी बदलल्या, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस