शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेत गोंधळ; मोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलतेच

By हेमंत बावकर | Updated: September 19, 2018 11:49 IST

 पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात येत्या 23 सप्टेंबरपासून करणार आहेत. मात्र, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून येत आहे. मोबाईल नंबर एकाचा आणि नावे दुसऱ्यांचीच असे प्रकार झाल्याने दोन्ही कुटुंबे 5 लाखांच्या विमा संरक्षणापासून मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. यासाठी 30 एप्रिलपासून एक मोहीम चालविण्यात आली होती. याद्वारे या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांची माहिती, मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर गोळा करण्यात आले. 

या योजनोसाठी पात्र असल्याची माहिती mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर तपासली असता धक्कादायक वास्तव समोर आले. सिंधुदुर्गच्या एका कुटुंबप्रमुखाचा मोबाईल नंबर टाकून त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता हिंगोलीच्या गिरगावातील एका कुटुंबाचे नाव आले. या कुटुंबामध्ये सात जण आहेत. या गोंधळामुळे सिंधुदुर्गमधल्या कुटुंबासह हिंगोलीतील कुटुंबही या योजनेच्या लाभापासून मुकण्याची शक्यता आहे. 

विशेष म्हणजे हा मोबाईल नंबर 2010 पासून सिंधुदुर्गमध्ये वापरात आहे. परंतू जनगणना 2011 मध्ये झालेली होती. तसेच 30 एप्रिल 2018 पासून एसईसीसीने मोहीम राबविली होती. यामध्ये ग्रामसभांमधून पात्र कुटुंबांचे मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड घेण्यात आले होते. असे असूनही गेल्या 9 वर्षांपासून मोबाईल नंबर सिंधुदुर्गमध्ये वापराला जात आहे. तसेच हिंगोली सिंधुदुर्गपासून सुमारे 600 किमी दूर आहे. 

आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...

पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून केवळ 10 कोटी कुटुंबांनाच विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये शहरी भागातील कुटुंबांचाही समावेश आहे. यामुळे आधीच बरीच गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहणार असताना ज्या कुटुंबांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे त्यांनाही अशा प्रकारच्या गोंधळामुळे मुकावे लागणार आहे.  

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतsindhudurgसिंधुदुर्गNandedनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारMobileमोबाइल