शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी जनतेचा विश्वासघात केला

By admin | Updated: March 8, 2015 02:25 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत.

शरद पवार यांचा घणाघात : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल नवी मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पोकळ घोषणाबाजी करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या विविध भागांत दुष्काळ पसरला आहे. पिण्यासाठी पाणी नाही. गुरांना चारा नाही. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी केंद्राची टीम येऊन गेली. परंतु आजतागायत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. कामगारविरोधी निर्णय घेतले जात आहेत. माथाडी कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल पवार त्यांनी उपस्थित केला. केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणीत सरकार जनतेच्या हिताला बगल देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून जनमत मोदीविरोधी होऊ लागले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या विविध पोटनिवडणुकीतून हे दिसून आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पराभवाने खचून न जाता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांचा प्रचार व प्रसार करा, विजय आपलाच आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांचीही भाषणे झाली. यावेळी आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, महपौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)...तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधआघाडी सरकारने बनविलेल्या भूसंपादनाच्या सर्वव्यापी कायद्यात मोदी सरकारने बदल केले आहेत. हे बदल शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदारांच्या विरोधात आहेत. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याला तीव्र विरोध केला जाईल, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.