शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 13:51 IST

शहरातील महापालिका विषय संपलेला आहे. त्यावर फार चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. महापालिकेत काय करायचे हे आमचे ठरलेले आहे असं राऊतांनी म्हटलं. 

नाशिक - कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची वज्रमूठ तोडू शकत नाही. मराठी माणसांची एकजुटीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढत आहेत. मुंबईच नाही तर नाशिक, कल्याण डोंबिवली, ठाणे येथेही आम्ही एकत्रित लढू असं विधान करत खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्रित येऊन जिंकणार आहेत. नाशिकमध्येही एकत्रित लढणार आहोत. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक महापालिकांमध्ये एकत्र लढणार आहोत. याबाबत आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद आहे. कोणतीही अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ तोडू शकत नाही. महाराष्ट्र दुर्बळ, कमकुवत व्हावा यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती मराठी माणसाला, महाराष्ट्राला नामर्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मराठी माणसांनी स्वाभिमानाच्या प्रश्नावर लढण्यासाठी उठू नये असा त्यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नरेंद्र मोदी ७५ वर्षाचे होतील, देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली. स्वातंत्र्यानंतर देशात सुई धागाही बनत नव्हता आज हा देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाते. काही नेत्यांना वाटते २०१४ साली देश स्वातंत्र्य झाला पण देश २०१४ नंतर खड्ड्यात गेला. प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काही योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षात भाजपाचे इतकेच योगदान आहे की, हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. भारतवर्ष हा देश श्रद्धाळू, धार्मिक होता पण भाजपाने राजकीय स्वार्थासाठी टोकाचे धर्मांध केले. ही धर्मांधता देशात धार्मिक फूट पाडतेय, ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, काय खायचे, काय प्यायचे आणि तलवार कशी उपसायची हे मराठी माणसांना माहिती आहे. ही तलवार दोन ठाकरे बंधूंनी उपसली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे हे उसळून येईल. जिल्हा परिषदा आम्ही ताकदीने लढवणार आहोत. शहरातील महापालिका विषय संपलेला आहे. त्यावर फार चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. महापालिकेत काय करायचे हे आमचे ठरलेले आहे असं राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेBJPभाजपा