शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:02 IST

राज्यातील आरक्षण वादावरून राज ठाकरेंनी भाष्य करत शरद पवारांवरही निशाणा साधला. 

पुणे - मतांसाठी मनं कलुषित करणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण नाही. लहान मुलींचे व्हिडिओ पाहिले हे अत्यंत दुर्दैवी, राजकारण्यांनी याचा विचार केला पाहिजे. आपसात जे काही मतभेद असतील, मतदान करून घ्यायचं असेल ते करा पण जातीपातीत विष कालवून तुम्हाला मतदान करून घ्यायचं असेल तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षण वादावरून राज यांनी हे भाष्य केले.

गेल्या २ दिवसांपासून राज ठाकरे पुण्यात पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यानंतर आज त्यांनी पुण्यातील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी केलेले विधान मी ऐकलं नाही. शरद पवारांनी हातभार लावू नये. राज्यात जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार. आपण सहजपणे सुटू शकतो असं काहींना वाटायला लागते, तेव्हा भीती नावाची गोष्ट उरलेली नसते. महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी मनं कलुषित करण्याचं जे काही सुरू आहे ते चांगले नाही असं सांगत शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती घडू शकते या विधानावर राज यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत ते नसतानाही धरणं वाहतंय. मुळा मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झालीत. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. लोकांची अनेक वाहने पाण्याखाली होती. लोकांना पूर्वसूचना न देता पाणी सोडलं असेल तर राज्य सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे मी पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही असं सांगतोय, टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. शहर नियोजनात शाळा, बागा या गोष्टी येतात. पण राज्यात कुठेही हा प्रकार दिसत नाही. दिसली जमीन की विक हा प्रकार राज्यात सुरु आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला. 

दरम्यान, महापालिका अधिकारी, बिल्डर, प्रशासन या साखळीतून या गोष्टी होतायेत. पुण्यात एक शहर राहिले नाही तर ५-५ शहरं झालीत. पुण्यात खूप कमी काळात या गोष्टी घडल्यात. शहर कुठपर्यंत पसरतंय हे कळत नाही. गेली २-३ वर्ष केंद्र सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही मग जबाबदारी घेणार कुणी, प्रशासनाशी बोलायचं कुणी यामुळे या पुराची जबाबदारी प्रशासनाची आहे. बाहेरून येणाऱ्यांना फुकट घरे मिळतात या राज्यातील लोकांना भीका मागावी लागते. राज्य म्हणून कुणाचं लक्ष आहे की नाही. प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कुणी विचार करणार की नाही. झोपडपट्टी पूर्नवर्सनात अनेक बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात घरे घेतायेत असं सांगत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणfloodपूरMNSमनसे