शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:02 IST

राज्यातील आरक्षण वादावरून राज ठाकरेंनी भाष्य करत शरद पवारांवरही निशाणा साधला. 

पुणे - मतांसाठी मनं कलुषित करणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण नाही. लहान मुलींचे व्हिडिओ पाहिले हे अत्यंत दुर्दैवी, राजकारण्यांनी याचा विचार केला पाहिजे. आपसात जे काही मतभेद असतील, मतदान करून घ्यायचं असेल ते करा पण जातीपातीत विष कालवून तुम्हाला मतदान करून घ्यायचं असेल तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षण वादावरून राज यांनी हे भाष्य केले.

गेल्या २ दिवसांपासून राज ठाकरे पुण्यात पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यानंतर आज त्यांनी पुण्यातील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी केलेले विधान मी ऐकलं नाही. शरद पवारांनी हातभार लावू नये. राज्यात जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार. आपण सहजपणे सुटू शकतो असं काहींना वाटायला लागते, तेव्हा भीती नावाची गोष्ट उरलेली नसते. महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी मनं कलुषित करण्याचं जे काही सुरू आहे ते चांगले नाही असं सांगत शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती घडू शकते या विधानावर राज यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत ते नसतानाही धरणं वाहतंय. मुळा मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झालीत. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. लोकांची अनेक वाहने पाण्याखाली होती. लोकांना पूर्वसूचना न देता पाणी सोडलं असेल तर राज्य सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे मी पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही असं सांगतोय, टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. शहर नियोजनात शाळा, बागा या गोष्टी येतात. पण राज्यात कुठेही हा प्रकार दिसत नाही. दिसली जमीन की विक हा प्रकार राज्यात सुरु आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला. 

दरम्यान, महापालिका अधिकारी, बिल्डर, प्रशासन या साखळीतून या गोष्टी होतायेत. पुण्यात एक शहर राहिले नाही तर ५-५ शहरं झालीत. पुण्यात खूप कमी काळात या गोष्टी घडल्यात. शहर कुठपर्यंत पसरतंय हे कळत नाही. गेली २-३ वर्ष केंद्र सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाही मग जबाबदारी घेणार कुणी, प्रशासनाशी बोलायचं कुणी यामुळे या पुराची जबाबदारी प्रशासनाची आहे. बाहेरून येणाऱ्यांना फुकट घरे मिळतात या राज्यातील लोकांना भीका मागावी लागते. राज्य म्हणून कुणाचं लक्ष आहे की नाही. प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कुणी विचार करणार की नाही. झोपडपट्टी पूर्नवर्सनात अनेक बाहेरचे लोक मोठ्या प्रमाणात घरे घेतायेत असं सांगत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणfloodपूरMNSमनसे