शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

मोदी साहेब टाळी, थाळी नको प्लीज, आता 'या' विषयावरही बोला; मनसेने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:32 IST

सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मीचं आभार व्यक्त करण्यासाठी दरवाजा, खिडकी, गॅलरीत 5 मिनिटं उभे राहून त्यांचे टाळ्या, थाळ्या, घंटा त्यांना अभिवादन करू अशी साद घातली होती.

देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लॉकडाऊन, संचारबंदीसारखे उपाय लागू करूनही त्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. देशातील बहूतांश भागात लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही लोक घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना मोदी काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

coronavirus : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज पुन्हा देशवासियांशी संवाद साधणार

नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. तसेच सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मीचं आभार व्यक्त करण्यासाठी दरवाजा, खिडकी, गॅलरीत 5 मिनिटं उभे राहून त्यांचे टाळ्या, थाळ्या, घंटी वाजवून त्यांना अभिवादन करू अशी साद घातली होती. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु आता टाळ्या थाळ्या नको, तर देशातील नागिकांना कसं जगवणार यावर बोला अशी मागणी मनसेने केली आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या की, नरेंद्र मोदी साहेब तुम्ही संवाद साधा, पण कोरोनासाठी केंद्र सरकारने किती निधी पाठवला आहे. रुग्णालय, औषधं, कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी लस, सरकारची उपाययोजना या विषयावर आता बोला असं रुपाली पाटील यांनी सांगितले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांपैकी 12 जणांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं काहीसा दिलासा मिळाला असताना आणखी 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 5, तर अहमदनगरमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 107 वर पोहचला आहे.तसेच देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 500 वर गेली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जगातील ३५ देशांनी लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनेक देशांनी तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केली असून देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. संपर्क आणि संसर्गामुळे करोना होत असल्याने तो रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र