शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:16 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई - हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय पटलावर युती करणार का याबाबत अजूनही साशंकता आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीबाबत सकारात्मकता दाखवण्यात आली असली तरी राज ठाकरे यांनी युतीवर कुणीही भाष्य करू नका असा आदेशच नेते, पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यातच मनसेचे आजपासून २ दिवसीय शिबिर नाशिकच्या इगतपुरी येथे पार पडणार आहे. या शिबिराला राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्याठिकाणी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या शिबिराबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, पक्षसंघटनेचे २ दिवसीय शिबिर आहे. या शिबिरात अनेक विषयांवर चर्चा केली जाईल. राजसाहेब नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. पक्षातंर्गत विविध विषयांवर चर्चा होईल. मात्र शिबिरात काय मुद्दे असतील, कशावर चर्चा होईल हे आम्हाला माहिती नाही. तिथे गेल्यावर आम्हाला कळेल असं त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जुलैपर्यंत हे शिबिर असणार आहे. त्यासाठी नेते, पदाधिकारी इगतपुरीत दाखल झाले आहेत. 

मनसेची मोर्चेबांधणी

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक मराठी भाषा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले. त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली. त्यामुळे मनसे-उद्धवसेना या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. हिंदी सक्तीला होणारा विरोध पाहून राज्य सरकारने याबाबत काढलेले दोन्ही जीआर मागे घेत असल्याचे घोषित केले. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले. १८ वर्षांनी पहिल्यांदाच राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आले त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू युती होणार अशी चर्चा सुरू झाली. 

"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…"

दरम्यान, युतीबाबत संजय राऊत यांनी सामना रोखठोकमध्ये भाष्य केले होते. त्यावर मी संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये काय लिहिले होते, हे अजून वाचलेलं नाही. युती होणार की नाही याबाबत मला माहिती नाही. त्याबद्दल राज ठाकरे हे बोलतील. पक्षाचे प्रमुख हे आमच्यापेक्षा एक हजार फूट अधिक पुढे असतात. पक्षाचं हित कशात आहे, हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. मनसेने आतापर्यंत निवडणुका ह्या  एकट्याने लढवलेल्या आहेत. त्यामुळे आताही वेळ आली तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू शकतो असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने ठाकरे बंधू युतीवर संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरhindiहिंदी