शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

"मुख्यमंत्र्यांचं वागणं धीरोदात्त, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ठरल्याप्रमाणे बैठक घेतली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 19:53 IST

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कृतीनं साऱ्यांची मनं जिंकली. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ‘धीरोदात्त मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

मुंबईः कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचं विविध स्तरांतून कौतुक होतंय. प्रत्येक निर्णय संयमाने अन् विचारपूर्वक घेऊन त्यांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली, अशी दाद अनेक जण देत आहेत. कोरोना चाचणीचे शुल्क ५० टक्के कमी करून महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनंही राज्य सरकारची पाठ थोपटलीय. या पार्श्वभूमीवरच, उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कृतीनं साऱ्यांची मनं जिंकली.

उद्धव ठाकरे यांचे सासरे, रश्मी ठाकरेंचे वडील माधव पाटणकर यांचं आज सकाळी निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकरे कुटुंबासाठी हा दुःखाचा प्रसंग असतानाही, मुख्यमंत्र्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांसोबत ठरलेली बैठक घेतली. त्याबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा ‘धीरोदात्त मुख्यमंत्री’ म्हणून गौरव केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंच्या वडिलांचे निधन

"महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली, इतर राज्यांनी अनुकरण करावं"

‘राज्याची काळजी वाहणारे मुख्यमंत्री!’

कपिल पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितातः

‘‘मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे आज दुःखद निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सारे सहभागी आहोत. निधनाची बातमी कळताच मी शिक्षण आयुक्त यांना मेसेज केला. शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री यांच्या Video Conference बद्दल विचारणा केली. तेव्हा शिक्षण आयुक्त यांनी खालील मेसेज पाठवला - 'Yes. Still he is taking the VC. Really appreciated. He took your name and other experts to involve in pilot for Tablets / online studies.'

घरात दुःखाचा आघात झाला असताना, मुख्यमंत्री यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली VC रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे.’’

मुख्यमंत्र्यांचं नवं मिशन! आज १२ मोठ्या करारांवर करणार स्वाक्षऱ्या

जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरु होणार, मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला, पण...

जुलैमध्ये भरणार शाळा  

शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षण तज्ज्ञांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन जुलै महिन्यात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. एका महिन्याभरात एकही कोविड-१९ रुग्ण आढळला नसलेल्या भागात पुढच्या महिन्यापासून शाळा सुरू होतील. जुलै महिन्यापासून इयत्ता नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शाळा सप्टेंबरपासून सुरू होईल. दरम्यानच्या काळात डिजिटल माध्यमातून वर्ग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस