शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 23:07 IST

सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil :मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा प्रस्ताव अमाान्य करत मुंबईकडे कूच केली आहे. जोपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे सरकार आरक्षण देत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र मुंबईकडे कूच करण्याआधी सरकारच्या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्याशी जरांगे पाटील यांनी प्रस्तावावर चर्चा केली होती. या चर्चेवेळी शिष्टमंडळातील बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांना जरांगे यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. मात्र नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांची भूमिका मवाळ झालेली पाहायला मिळाली. "ते दोघेही बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळत आहेत," असं जरांगे पाटील म्हणाले.

राज्य सरकारला पुरेसा वेळ दिल्यानंतरही सरकारने आमच्या मनाप्रमाणे तोडगा काढला नाही, असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आम्हाला मुंबईला येण्याची वेळ आली, असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. मात्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, आता प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे, असं उत्तर राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती आंदोलनस्थळी मंगेश चिवटे हे देत होते. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा पारा चढला. तुम्ही फक्त सरकारची बाजू मांडणार असाल तर आमचं आणि तुमचं जमणार नाही, असं चिवटे यांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी काल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा सूर बदलेला पाहायला मिळाला. सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले मंगेश चिवटे हे आंदोलक आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचारासाठी केलेल्या मदतीमुळे, तसेच आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळवून दिलेल्या आर्थिक मदतीमुळे मनोज जरांगे पाटील हे मंगेश चिवटे यांच्या सातत्याने संपर्कात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी त्याच मंगेश चिवटे यांच्याशी चर्चा करताना राग व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु आता जरांगे पाटील यांनी मवाळ भूमिका घेत मंगेश चिवटे आणि बच्चू कडू यांच्याविषयी सहानुभूती दर्शवली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण