शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 23:07 IST

सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil :मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा प्रस्ताव अमाान्य करत मुंबईकडे कूच केली आहे. जोपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे सरकार आरक्षण देत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र मुंबईकडे कूच करण्याआधी सरकारच्या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्याशी जरांगे पाटील यांनी प्रस्तावावर चर्चा केली होती. या चर्चेवेळी शिष्टमंडळातील बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांना जरांगे यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. मात्र नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांची भूमिका मवाळ झालेली पाहायला मिळाली. "ते दोघेही बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळत आहेत," असं जरांगे पाटील म्हणाले.

राज्य सरकारला पुरेसा वेळ दिल्यानंतरही सरकारने आमच्या मनाप्रमाणे तोडगा काढला नाही, असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आम्हाला मुंबईला येण्याची वेळ आली, असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. मात्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, आता प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे, असं उत्तर राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती आंदोलनस्थळी मंगेश चिवटे हे देत होते. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा पारा चढला. तुम्ही फक्त सरकारची बाजू मांडणार असाल तर आमचं आणि तुमचं जमणार नाही, असं चिवटे यांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी काल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा सूर बदलेला पाहायला मिळाला. सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले मंगेश चिवटे हे आंदोलक आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचारासाठी केलेल्या मदतीमुळे, तसेच आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळवून दिलेल्या आर्थिक मदतीमुळे मनोज जरांगे पाटील हे मंगेश चिवटे यांच्या सातत्याने संपर्कात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी त्याच मंगेश चिवटे यांच्याशी चर्चा करताना राग व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु आता जरांगे पाटील यांनी मवाळ भूमिका घेत मंगेश चिवटे आणि बच्चू कडू यांच्याविषयी सहानुभूती दर्शवली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण