शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

मिशन ४० + हा दावा नव्हे तर आमचा आत्मविश्वास; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 11:29 IST

इंडिया आघाडीचे सगळेच नेते उद्धव ठाकरेंचा आदर करतात. दिल्लीत अनेक नेते उद्धव ठाकरेंना भेटले असं राऊतांनी सांगितले. 

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News )आम्ही जी तयारी केलीय ती किमान ३५ ते ४० जागांसाठी आहे. काही प्रमुख नेते शिवसेनेत किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर गणिते बदलणार आहे. लोकसभेच्या किमान ४० जागांवर आम्ही जिंकू हा विश्वास आहे असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे आलाय तो पहिल्या टप्प्यातील असेल.अजून बरीच गणिते बदलणार आहेत. भाजपा ४८ हून अधिक जागा जिंकेल.कारण भाजपा हा हवेतला पक्ष आहे. जमिनीवरचा नाही. जो पक्ष मिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांवर उभे आहेत त्यांनी ४८ जागा जिंकण्याचा दावा करू नये. आमची क्षमता ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आहे. मिशन ४० + हा आमचा दावा नसून तो आत्मविश्वास आहे असं त्यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरे सर्वमान्य नेते

उद्धव ठाकरेंना मानणारा देशात मोठा वर्ग आहे. देशात ज्याप्रकारे हुकुमशाही सुरू आहे. त्याविरोधात उघडपणे मैदानात उतरून उद्धव ठाकरे लढतायेत. उद्योगपती अदानींविरोधात सगळेच बोलतात पण मुंबईच्या रस्त्यावर लाखोंचा मोर्चा ठाकरेंनी काढला. अदानी म्हणजे मोदी हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही रस्त्यावर उतरलोय, राहुल गांधींनंतर उघडपणे बेधडकपणे उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढतायेत. त्यामुळे ठाकरे देशात सर्वमान्य नेते आहेत. इंडिया आघाडीचे सगळेच नेते उद्धव ठाकरेंचा आदर करतात. दिल्लीत अनेक नेते उद्धव ठाकरेंना भेटले असं राऊतांनी सांगितले. 

लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी चर्चा

बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेबांची आणि आमची भूमिका सारखीच आहे. देशात संविधान टिकावे, लोकशाही टिकावी. मोदींची हुकुमशाही संपवावी असं मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमची त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसणार आहेत. काँग्रेसच्या स्थापनादिवसानिमित्त काही नेते व्यस्त आहेत. प्रकाश आंबेडकर असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील. शिवसेनेच्या बरोबरीने महाराष्ट्रात मोदींच्या हुकुमशाहीविरोधात हल्ले करत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. संविधान बचाव संघर्ष, हुकुमशाहीविरोधात त्यांची भूमिका अत्यंत परखड आहेत. प्रकाश आंबेडकर काही चुकीचा निर्णय घेतील हे महाराष्ट्र किंवा देशाला वाटत नाही असं संजय राऊत म्हणाले.

सरकारचं लक्ष विरोधकांना नामोहरण करायचं

आपले जवान शहीद होतायेत, पोलिसांची हत्या होतेय. हे सरकारला काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे हे कशावरून दावा करतायेत? पूंछच्या हल्ल्याला जबाबदार कोण? २५-३० बड्या लष्करी अधिकाऱ्यांचे बलिदान गेलंय. सरकार ईडीचा दुरुपयोग, विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. काश्मीरची अवस्था सुधारणार कोण? यावर बोलायला हवं. मेहबूबा मुफ्ती यांनी जे म्हटलं ते योग्य आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी काश्मीरमधील परिस्थितीवर दिली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर