शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मोठा गौप्यस्फोट! "मविआ सरकार पाडण्यासाठी १५० बैठका, बंड पुकारणारा मी पहिला आमदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 12:22 IST

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक आमदाराचे मी मन वळवत होतो आणि उघड माथ्याने हे करत होतो. कुणाला लपवून करत नव्हतो असंही तानाजी सावंत म्हणाले. 

मुंबई - २०१९ च्या राज्यातील सत्तानाट्यानंतर अवघ्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले. हे सरकार पाडण्यासाठी १००-१५० बैठका झाल्या. सरकार उलथवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा मी घेतली होती असा गौप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत यांनी केला. 

मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, २०१९ ला निवडणुका झाल्या, जनतेने शिवसेना-भाजपा युतीचे १८० हून अधिक उमेदवार निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून जनतेकडे मते मागितली. २०१४ च्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा २०१९ मध्ये सत्तेत येण्याचा जनादेश लोकांनी दिला. ही वस्तूस्थिती आहे. तेव्हा युतीत मिठाचा खडा टाकल्याशिवाय युती संपणार नाही हे शरद पवारांना कळाले. तेव्हा उद्धव ठाकरेंना ही आघाडी करू नका असं सांगणारा पहिला आमदार मी होतो. साहेब, यांच्या नादाला लागाल तर आत्मघात ठरेल असं मी उद्धव ठाकरेंना म्हटलं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत पक्षाचे वाटोळे होईल हा निर्णय घेऊ नका, पहिला शिवसैनिक आणि आमदार मीच होतो. हा सल्ला दिल्यामुळे त्यावेळच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंतला दूर ठेवले. २०१९ नंतरचे मी सांगतो. सत्ता परिवर्तनाचे काम सुरू होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माझ्यात जवळपास १०० ते १५० बैठक झाल्या. त्यावेळी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक आमदाराचे मी मन वळवत होतो आणि उघड माथ्याने हे करत होतो. कुणाला लपवून करत नव्हतो असंही तानाजी सावंत म्हणाले. 

दरम्यान, मी जे बोलतो ते करून दाखवतो. ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारीला सुजितसिंह ठाकूर, मी स्वत: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपाची सत्ता आणली. त्यावेळी बंडाचे निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. पुन्हा मातोश्रीचे पायरी चढणार नाही असं सांगणारा मी पहिला होतो. हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही याची प्रचिती तुम्हाला आली असा टोला तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेTanaji Sawantतानाजी सावंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस