शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:30 IST

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तर उबाठा पक्ष १ जुलै रोजी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मागील एक वर्षात झालेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेते सातत्याने मोठी विधाने करत आहेत. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. 

जी लोक १ जुलैला मोर्चा काढत आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याची टीका केसरकरांनी केली. "खोटं किती बोलावं याला प्रमाण असते. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी खरं बोलायला शिकायला हवं", असे केसरकरांनी ठाकरेंची सुरक्षा हटवली असल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकर म्हणाले की, औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम झाले असेल तर त्यांनी ते सांगावे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य चालवत आहोत. छत्रपती संभाजी महाराज आणि मराठी सरदारांना आम्हाला विसरता येणार नाही. उद्धव ठाकरेंचे औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम पाहायला मिळते आहे. हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच माफ करणार नाहीत. तसेच सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची लाचारी केली हे ठाकरेंनी कबुल करावे. 

अलीकडेच केसरकरांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. "गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पुकारलेले बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: डोक्यात गोळी झाडून घेणार होते", असे विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले.  

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजHindutvaहिंदुत्व