शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:30 IST

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तर उबाठा पक्ष १ जुलै रोजी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मागील एक वर्षात झालेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेते सातत्याने मोठी विधाने करत आहेत. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. 

जी लोक १ जुलैला मोर्चा काढत आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याची टीका केसरकरांनी केली. "खोटं किती बोलावं याला प्रमाण असते. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी खरं बोलायला शिकायला हवं", असे केसरकरांनी ठाकरेंची सुरक्षा हटवली असल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकर म्हणाले की, औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम झाले असेल तर त्यांनी ते सांगावे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य चालवत आहोत. छत्रपती संभाजी महाराज आणि मराठी सरदारांना आम्हाला विसरता येणार नाही. उद्धव ठाकरेंचे औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम पाहायला मिळते आहे. हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच माफ करणार नाहीत. तसेच सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची लाचारी केली हे ठाकरेंनी कबुल करावे. 

अलीकडेच केसरकरांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. "गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पुकारलेले बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: डोक्यात गोळी झाडून घेणार होते", असे विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले.  

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजHindutvaहिंदुत्व