शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:50 IST

सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली.

मुंबई : सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली. मुंबई उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. मुसळधार पाऊस आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईच्या उपनगरातील वाहतूक संथ झाली होती. विशेषत: ठिकठिकाणी झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबईकर बेजार झाले होते. मंगळवारीही मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला भारतीय हवामान शास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.मुंबई शहरात फोर्ट, कुलाबा, मरिन ड्राइव्ह, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर, लोअर परळ परिसरात पावसाचा जोर कमी होता. कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, बोरीवली आणि गोरेगाव परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. पावसादरम्यान दुर्घटनाही घडल्या असून, सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना विद्यापीठाच्या परिसरात घनकचरा खात्याच्या वाहनावर विजेचा खांब पडून क्लीनरला किरकोळ मार लागला. मोहम्मद शोएब अन्सारी असे जखमी क्लीनरचे नाव असून, घटनास्थळीच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मुलुंड पश्चिमेकडील वीणानगर परिसरातील नाल्यात पडलेल्या एका मुलाला स्थानिकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले.शहरात ५, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ८ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. शहरात ६, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ११, पूर्व उपनगरात २२, पश्चिम उपनगरात १३ अशा एकूण ४६ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.।राज्यात दम‘धार’, तीन दिवस पावसाचेपश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर व मध्य भारतात दमदार पाऊस कोसळू लागला आहे. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आले आहेत. धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून अनेक धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खरीप पिकांच्या वाढीला हा पाऊस उपयोगी असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. अजून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़>कोकण, कोल्हापुरात धुवाधारकोकणासह कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. सिंधुुदुर्गमध्ये गडनदी, जानवली नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरीतील मिºया-पंधरा माड कोंड व संपूर्ण मिºया गावाच्या किनाºयाला सलग चौथ्या दिवशी भरतीच्या अजस्त्र लाटांनी जोरदार तडाखा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला असून पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.>मराठवाड्यात संततधारमराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सोमवारी दिवसभर संततधार होती. औरंगाबादमध्ये दिवसभर रिपरिप होती. हिंगोलीत १२ दिवसांपासून पाऊस आहे. बीड, नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला़ परभणीत ओढ्या-नाल्यांना प्रथमच पाणी आले. लातूर, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात रिमझिम सुरू होती़विदर्भात अतिवृष्टीविदर्भात गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. गडचिरोलीमध्ये सकाळी संपलेल्या २४ तासात ७०.६ मिमी एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. धानोरा, चामोर्शी, मुरचेरा, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली. अहेरी तालुक्यात प्राणहिता नदीत डोंगा उलटून व्यंकटेश शंकर सिडाम (२५) हा युवक वाहून गेला. गोंदियातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पुन्हा पाणी शिरले.धरणांमधून विसर्गनाशिकमध्येही पावसाचा जोर आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के साठा झाला असून गंगापूरसह दारणा, चणकापूर, पुनद या चार धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.>१७ जुलै रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१८ जुलै रोजी कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१९ जुलै कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.२० जुलै रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.>राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊसबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तसेच दक्षिण गुजरातमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे सध्या महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, राज्यात नंदूरबार वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.- डॉ़ ए़ के. श्रीवास्तव, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, पुणे.

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटSatara areaसातारा परिसरkonkanकोकणMumbaiमुंबईKurlaकुर्लाGhatkoparघाटकोपरGadchiroliगडचिरोली