शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

माथेरानकरांनी एका सुरात सांगितले ई-रिक्षा हवीच! ‘टिस’च्या पथकाने साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 07:16 IST

मोरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५ डिसेंबरपासून ई-रिक्षा सुरू करण्यात आली असून अभ्यासानंतर ही सेवा कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कर्जत :

मोरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५ डिसेंबरपासून ई-रिक्षा सुरू करण्यात आली असून अभ्यासानंतर ही सेवा कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस) त्याबाबत अहवाल सादर करणार आहे. त्यांच्या पथकाने माथेरानकरांचा कानोसा घेतल्यानंतर ई-रिक्षा हवीच, असे ठाम मत माथेरानकरांनी व्यक्त केले आहे. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्राचार्या अनिता भिडे, प्रा. सुहास भस्मे यांनी या सेवेबाबत माथेरानच्या नागरिकांसोबत  संवाद साधला. माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सर्वसमावेशक निर्णय झाला पाहिजे, असे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक सिस्टर पाऊलीन, कल्पना पाटील व लक्ष्मण ढेबे यांनी ई-रिक्षामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबली असून, अभ्यासातील लक्ष वाढले असल्याचे निरीक्षण नोंदवत कॉन्व्हेंट शाळा दस्तुरी नाक्यापासून ५ किमी दूर असल्याने शाळेला शिक्षक मिळत नाहीत. ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू झाली, तर चांगले  शिक्षक मिळू शकतील, अशी भावना व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हरिभाई मेहता व अरविंद शेलार यांनी ई-रिक्षा वरदान ठरत असल्याचे सांगितले. हनिफ चिपाडे यांनी त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी १२ तास वाट पाहावी लागली होती. आता हा त्रास कायमचा संपला पाहिजे. कायद्यापेक्षा नागरिकांचे प्राण महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. 

माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी ई-रिक्षाचा वापर फक्त स्थानिक रहिवाशांसाठी मर्यादित असावा व ती स्टेशनपर्यंत चालवावी, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश अंतिम आहे. कोर्टाच्या आदेशाला फाटे फोडण्याचे काम कोणी करू नये, असे श्रमिक रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी सांगितले. प्राचार्य अनिता भिडे यांनी ई-रिक्षाच्या परिणामांचा अभ्यास करताना येथील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व पर्यावरणाचा समतोल या गोष्टींवर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. आमचे पथक पुढील काही दिवस नागरिकांसोबत थेट संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. अश्वपाल संघटनेच्या आशा कदम, विकास रांजणे, पालिकेचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे, पोलिस उपनिरीक्षक शेखर लव्हे आदी उपस्थित होते.

माथेरानकर काय म्हणतात..  ई-रिक्षा माथेरानच्या पर्यटनात क्रांती घडवेल  विद्यार्थ्यांची पायपीट थांबली असून, अभ्यासातील लक्ष वाढले  माथेरानचा वर्षाचा शंभर दिवसांचा व्यवसाय १५० दिवसांपर्यंत जाईल

ई-रिक्षाच्या वाहतुकीतील बदलाचे माथेरानकरांना व पर्यटकांना होणारे फायदे, तोटे व या बदलामुळे एखादा समूह बाधित होणार असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जाणार आहे.- अनिता भिडे, प्राचार्य, टाटा सामाजिक विज्ञान संस्था

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर