शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:29 IST

मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय

ठळक मुद्देराज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची मंगळवारी पुण्यात बैठक

पुणे : राज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात मातंग समाज लोकसंख्येने जास्त असूनही दुर्लक्षित राहिला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, राज्यभर लढा उभारून एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.         राज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची बैठक मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेद्वारे "मातंग स्पिक अभियान" ची घोषणा बैठकीचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, मछिन्द्र सकटे, हनुमंत साठे, प्रा.मिलिंद आव्हाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.     हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही अभियानाची मुख्य मागणी असल्याचे बागवे यांनी सांगितले.         बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करून समाजाचा विकास करावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य असावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कामकाज पुन्हा सुरू करावे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक तात्काळ करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आली. या मागण्यांसाठी राज्यभर सर्व समाज व समाजाच्या नेत्यांचे ऐक्य घडवून आणून, जनजागृती करण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.------

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार