शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

मराठवाडा अजूनही तहानलेला : राज्याच्या १७ जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:41 PM

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये पाऊस अतिशय कमी झाला असून हिंगोलीमध्ये तर सरासरीपेक्षा ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे़. 

ठळक मुद्दे३० टक्के कमी पाऊस मुंबई उपनगर, पालघरमध्ये सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची नोंद - मराठवाडा अजूनही तहानलेला

पुणे : संपूर्ण जून महिन्यात वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने अखेरच्या चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली़. कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे़. मुंबई उपनगर, पालघरमध्ये सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची नोंद झाली असतानाच मराठवाडा अजूनही तहानलेला आहे़. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये पाऊस अतिशय कमी झाला असून हिंगोलीमध्ये तर सरासरीपेक्षा ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे़. ‘वायु’चक्रीवादळामुळे जूनमधील मॉन्सूनचे आगमन लांबले़ पावसाळ्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस होतो़. पण, ‘वायु’ वादळामुळे हे सर्व बाष्प शोषले जाऊन सर्व पाऊस समुद्रात पडला़. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते़. पण जुनच्या अखेरच्या आठवड्यात मॉन्सूनची वाटचाल सुरु झाल्यानंतर राज्यात पाऊस परतला़. कोकण, उत्तर कोकणात त्याने कहर केला़. मात्र, घाटावरुन तो पुढे फारसा सरकला नाही़. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सर्व धरणातील पाणीसाठ्यात अजूनही फारशी मोठी वाढ झाली नाही़ मॉन्सून कमकुवत असल्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याचा बसला आहे़. मुंबई व कोकण परिसरात मुसळधार पाऊस झाला़. मुंबईची तुंबई झाल्याची वर्णने ऐकल्याने राज्यात पाऊस झाला असल्याचा गैरसमज शहरी भागातील लोकांचा होण्याचा संभव आहे़. मात्र, तसे नाही़ प्रत्यक्षात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजून जोरदार पावसाची आवश्यकता आहे़. मध्य महाराष्ट्रात अजूनही सरासरीपेक्षा १२ टक्के आणि विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पावसाची कमी आहे़. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झाला असून तेथे सरासरीच्या केवळ ३५ टक्के पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात १६० मिमी पाऊस आतापर्यंत पडला आहे़ प्रत्यक्षात मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत १८१़२ मिमी इतकी सरासरी आहे़. सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यापैकी ७ जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे़. विदर्भात आतापर्यंतची पावसाची सरासरी १९६.२ मिमी असते़. पण प्रत्यक्षात १४७़.६ मिमी पाऊस झाला असून तो २५ टक्के कमी आहे.मराठवाड्यात विभागात १ जून ते ३ जुलैदरम्यान१५५.१मिमी सरासरी पाऊस पडतो़. मात्र, आतापर्यंत केवळ १०८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने विदर्भात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता़. त्यामुळे तेथे सरासरीपर्यंत पावसाची शक्यता आहे़. मात्र, मराठवाड्यात जोरदार पावसासाठी आता पुन्हा मॉन्सूनचा जोर वाढल्यानंतर पाऊस होईल़. तोपर्यंत वाढ पहावी लागेल़.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा