शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 7:16 PM

राज्यात नव्याने २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत असून कुणबी व मराठा हे एकच आहे आणि त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे, असं राजेश टोपे म्हणाले.

नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून मराठ्यांचं ओबीसीकरण करणं चुकीचं असल्याचं सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. मात्र असं असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठे हे मूळ कुणबीच असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात छगन भुजबळ यांच्यासमोर टोपे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे हे राज्य आहे. अशा या राज्यात समाजा- समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये, सलोख्याने व गुणा- गोविंद्याने नांदण्याची वृत्ती त्यांच्यात असावी. या विचारांना समर्थन करत असताना ज्या काही समाजाच्या रास्त मागण्या आहेत, त्यांना शासनाने न्याय दिला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हे दिलेच पाहिजे; याबाबतीत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. शिवकालीन काळामध्ये ज्या लढाया होत होत्या, त्या काळात मर कर भी न हटनेवाला ओ मराठा है असा उल्लेख मराठा समाजाचा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा या समाजाला आरक्षणासाठी सवलती दिल्या आहेत. आम्ही मराठवाडा भागातून येतो; हा विभाग निजाम राजवटीतील आहे. या राजवटीत मराठा समाजाला आरक्षण असायचेच, कुणबी व मराठे हे एकच आहे. १९५० साली घटनेतून SC आणि ST पुरते आरक्षण आपण दिले, त्यानंतर हे आरक्षण बंद झाले. १९६७ साली मागासवर्गीयांसाठी झालेल्या निर्णयामध्ये मराठा, कुणबी असा उल्लेख आहे, ज्यात मराठा समाज आहे. यानंतर घटना समितीचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घरोघरी प्रचार केल्यानंतर विदर्भात त्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत व मराठवाडा त्यापासून वंचित राहिले. त्यांना आरक्षण मिळावे हिच तिथल्या जनतेची मागणी आहे," असं टोपे यांनी म्हटलं आहे.

"कुणबी व मराठा हे एकच, त्यादृष्टीने आरक्षण हवे"

मराठा आरक्षणाबद्दल पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समिती मार्फत हे प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम जी सुरु आहे, त्यात २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत. कुणबी व मराठा हे एकच आहे त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे. आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राने राज्य सरकारला दिले आहे. सरकारने मागच्या त्रुटींची दुरुस्ती करावी. सुप्रीम कोर्टाच्या मागच्या निरीक्षणाचा अभ्यास सरकारने करावा आणि असा निकाल द्यावा की ते आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे; त्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पाऊले टाकायला हवे," अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा समाज कुणबी असल्याचं सांगत आरक्षणाची मागणी केल्याने राजेश टोपे यांचा आगामी काळात छगन भुजबळ यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीChhagan Bhujbalछगन भुजबळ