शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

'एक मराठा, लाख मराठा' घोषणा ठरली निर्णायक !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 4:12 PM

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.

मुंबई - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायलयाने मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध ठरवले आहे. या विजयात मराठा समाजाचे शिस्तप्रिय ५८ मोर्चे, ५० हून अधिक युवकांचे बलिदान आणि विविध संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.

एक मराठा लाख मराठा असा नारा देत औरंगाबादमध्ये पहिला मूक मोर्चा निघाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एकत्र आला आणि महाराष्ट्रभर एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज एक झाला. त्यासाठी राज्यात आणि राज्याबाहेर तब्बल ५८ मोर्चे निघाले होते. या शिस्तप्रिय मोर्चाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. त्याची परिणीती म्हणजेच आजचा निर्णय म्हणावा लागले.

आघाडी सरकारने २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ते आरक्षण टीकू शकले नव्हते. त्यानंतर मराठा समाजाने आरक्षणाची लावून धरलेली मागणी आणि नव्या सरकराने मराठा आरक्षणासाठी न्यायालयात दिलेला लढ यामुळे आरक्षणाचा लढा जिंकण्यात मराठा समाजाला यश आले. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांनी निकाल दिला.

संघटनांचा पाठपुरव्याला यश

महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठा महासंघ, छावा, संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी केलेला पाठपुरावा मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण ठरला. मागील २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. यामध्ये विविध संघटनांनी मराठा समाजात आरक्षणाची मागणी धगधगत ठेवली होती. तो लढा आज सार्थकी लागली.