शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 11:40 AM

Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

औरंगाबाद - छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडले आहे. तसेच मराठा आरक्षणावर बोलू नका, असा फोन बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला आला आहे. माझ्याच पक्षाकडून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनात पत्रकार परिषदेत बोलताना केला. जाधव म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. आपल्याला फक्त फिरविले जात आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बसण्याची गरज आहे, तशी भूमिका कुठलाही पक्ष घेण्यास तयार नाही. माणसे मरत असताना माझा पक्ष मला म्हणतो, आरक्षणाबाबत बोलायचे नाही. याला तोडगा एकच आहे, आपले छत्रपती शासन आणणे. मराठा बांधवांनी यावर विचार करावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करणे गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. आपली माणसे निवडून आणावी लागतील. "विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊनच अध्यादेश काढता येईल. त्याला तीन महिने लागतील. दोन वर्षांपासून समाजाचे मोर्चे निघत असताना आता तीन महिने कशासाठी लागत आहेत. याचा अर्थ असा आहे की, आरक्षण द्यायचे नाही. वेळकाढू धोरण सरकार राबवीत आहे. मराठा युवक नैराश्यात येत आहेत. समाजाने नैराश्यात जाण्याऐवजी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून लढले पाहिजे." असा सल्ला जाधव यांनी दिला. पक्षप्रमुखांनीही फोन घेतला नाहीशिवसेनेचे गटनेते तथा मंत्री शिंदे यांनी फोन करून आरक्षणावर न बोलण्याची ताकीद दिली, ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली काय, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पक्षप्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांची भेटही झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडूनही काही दाद मिळाली नसल्याचे आ.जाधव म्हणाले. त्यांच्या विधानामुळे शिवसेनेची मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आ.जाधव म्हणाले, छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvidhan sabhaविधानसभा