शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

Maratha Reservation : ७६.८६ टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:25 IST

सामाजिक दर्जा : आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक

मुंबई : प्रामुख्याने शेतीवर गुजराण करणारा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात ७६.८६ टक्के मराठा कुटुंब शेती आणि शेतमजुरीवर निर्भर असल्याने आढळून आले आहे.मराठा समाज उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असला तरी ७० टक्के मराठा शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. या समाजातील ७१ टक्के कुटुंब भूमिहीन आणि सिमांत भूधारक शेतकरी असून २.७ टक्के शेतकऱ्यांकडे दहा एकरपर्यंत जमीन आहे. २.२१ टक्के कुटुंबाकडे ट्रॅक्टर तर १ टक्का व्यावसायिक वाहनधारक आहेत.

...तरच आत्महत्या कमी होतीलमराठा समाजाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या व सदस्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वेक्षणातील ४०,९६२ कुटुंबातील ३४० सदस्यांनी आत्महत्या केली आहे. सन २०१३-२०१८ या कालावधीत शेती व्यवसायात असलेल्या १३,३६८ व्यक्तींनी आत्महत्या केली त्यात २३.५६ टक्के म्हणजे २१५२ व्यक्ती मराठा होत्या. आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या दुरावस्थेमुळे झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ९९.८६ टक्के आहे. हे प्रमाण इतर जाती समुहांपेक्षा जास्त आहे. मराठा समाजाने शेती शिवाय वैविध्यपूर्ण व्यवसायाकडे वळणे, आधूनिक शेतीची पध्दत अवलंबणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्या मनातील मागासलेपणाची भावना दूर होईल असेही आयोगाने म्हटले आहे.उदरनिर्वाहासाठी केवळ भटके-विमुक्त स्थलांतर करतात असा आजवर समज होता. मात्र मराठा समाजातही स्थलांतराचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे. नागरी विभागात स्थलांतरीत झालेला मराठा समाज प्रामुख्याने माथाडी हमाल आणि घरगुती कामात अधिक आहे. व्यापार व उद्योगामध्ये या समाजाचे प्रमाण इतर समूहापेक्षा कमी आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेतलेले केवळ ६.७१ टक्केमुंबई : मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून या क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. अशिक्षित १३.४२, प्राथमिक शिक्षण घेतलेले ३५.३१, टक्के, दहावी झालेले ४३.७९, टक्के, बारावी, पदवीपेक्षा कमी आणि पदव्युत्तर ६.७१ आणि तांत्रिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम ०.७७, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे प्रमाण ७.५६, टक्के असून हे प्रमाण इतर मागास वर्गापेक्षा जास्त आहे. मराठा समाजामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दर्जाच्या शिक्षणामध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ७९.५ व ६७ टक्के इतकी आहे. हे प्रमाण व इतर मागासवर्गपेक्षा कमी आहे. या बाबी लक्षात घेता मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होते असे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण