शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Maratha Reservation : ७६.८६ टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:25 IST

सामाजिक दर्जा : आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक

मुंबई : प्रामुख्याने शेतीवर गुजराण करणारा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात ७६.८६ टक्के मराठा कुटुंब शेती आणि शेतमजुरीवर निर्भर असल्याने आढळून आले आहे.मराठा समाज उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असला तरी ७० टक्के मराठा शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. या समाजातील ७१ टक्के कुटुंब भूमिहीन आणि सिमांत भूधारक शेतकरी असून २.७ टक्के शेतकऱ्यांकडे दहा एकरपर्यंत जमीन आहे. २.२१ टक्के कुटुंबाकडे ट्रॅक्टर तर १ टक्का व्यावसायिक वाहनधारक आहेत.

...तरच आत्महत्या कमी होतीलमराठा समाजाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या व सदस्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वेक्षणातील ४०,९६२ कुटुंबातील ३४० सदस्यांनी आत्महत्या केली आहे. सन २०१३-२०१८ या कालावधीत शेती व्यवसायात असलेल्या १३,३६८ व्यक्तींनी आत्महत्या केली त्यात २३.५६ टक्के म्हणजे २१५२ व्यक्ती मराठा होत्या. आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या दुरावस्थेमुळे झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ९९.८६ टक्के आहे. हे प्रमाण इतर जाती समुहांपेक्षा जास्त आहे. मराठा समाजाने शेती शिवाय वैविध्यपूर्ण व्यवसायाकडे वळणे, आधूनिक शेतीची पध्दत अवलंबणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्या मनातील मागासलेपणाची भावना दूर होईल असेही आयोगाने म्हटले आहे.उदरनिर्वाहासाठी केवळ भटके-विमुक्त स्थलांतर करतात असा आजवर समज होता. मात्र मराठा समाजातही स्थलांतराचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे. नागरी विभागात स्थलांतरीत झालेला मराठा समाज प्रामुख्याने माथाडी हमाल आणि घरगुती कामात अधिक आहे. व्यापार व उद्योगामध्ये या समाजाचे प्रमाण इतर समूहापेक्षा कमी आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेतलेले केवळ ६.७१ टक्केमुंबई : मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून या क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. अशिक्षित १३.४२, प्राथमिक शिक्षण घेतलेले ३५.३१, टक्के, दहावी झालेले ४३.७९, टक्के, बारावी, पदवीपेक्षा कमी आणि पदव्युत्तर ६.७१ आणि तांत्रिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम ०.७७, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे प्रमाण ७.५६, टक्के असून हे प्रमाण इतर मागास वर्गापेक्षा जास्त आहे. मराठा समाजामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दर्जाच्या शिक्षणामध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ७९.५ व ६७ टक्के इतकी आहे. हे प्रमाण व इतर मागासवर्गपेक्षा कमी आहे. या बाबी लक्षात घेता मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होते असे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण