शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Maratha Reservation : ७६.८६ टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:25 IST

सामाजिक दर्जा : आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक

मुंबई : प्रामुख्याने शेतीवर गुजराण करणारा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात ७६.८६ टक्के मराठा कुटुंब शेती आणि शेतमजुरीवर निर्भर असल्याने आढळून आले आहे.मराठा समाज उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असला तरी ७० टक्के मराठा शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. या समाजातील ७१ टक्के कुटुंब भूमिहीन आणि सिमांत भूधारक शेतकरी असून २.७ टक्के शेतकऱ्यांकडे दहा एकरपर्यंत जमीन आहे. २.२१ टक्के कुटुंबाकडे ट्रॅक्टर तर १ टक्का व्यावसायिक वाहनधारक आहेत.

...तरच आत्महत्या कमी होतीलमराठा समाजाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या व सदस्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वेक्षणातील ४०,९६२ कुटुंबातील ३४० सदस्यांनी आत्महत्या केली आहे. सन २०१३-२०१८ या कालावधीत शेती व्यवसायात असलेल्या १३,३६८ व्यक्तींनी आत्महत्या केली त्यात २३.५६ टक्के म्हणजे २१५२ व्यक्ती मराठा होत्या. आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या दुरावस्थेमुळे झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ९९.८६ टक्के आहे. हे प्रमाण इतर जाती समुहांपेक्षा जास्त आहे. मराठा समाजाने शेती शिवाय वैविध्यपूर्ण व्यवसायाकडे वळणे, आधूनिक शेतीची पध्दत अवलंबणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्या मनातील मागासलेपणाची भावना दूर होईल असेही आयोगाने म्हटले आहे.उदरनिर्वाहासाठी केवळ भटके-विमुक्त स्थलांतर करतात असा आजवर समज होता. मात्र मराठा समाजातही स्थलांतराचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे. नागरी विभागात स्थलांतरीत झालेला मराठा समाज प्रामुख्याने माथाडी हमाल आणि घरगुती कामात अधिक आहे. व्यापार व उद्योगामध्ये या समाजाचे प्रमाण इतर समूहापेक्षा कमी आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेतलेले केवळ ६.७१ टक्केमुंबई : मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून या क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. अशिक्षित १३.४२, प्राथमिक शिक्षण घेतलेले ३५.३१, टक्के, दहावी झालेले ४३.७९, टक्के, बारावी, पदवीपेक्षा कमी आणि पदव्युत्तर ६.७१ आणि तांत्रिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम ०.७७, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे प्रमाण ७.५६, टक्के असून हे प्रमाण इतर मागास वर्गापेक्षा जास्त आहे. मराठा समाजामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दर्जाच्या शिक्षणामध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ७९.५ व ६७ टक्के इतकी आहे. हे प्रमाण व इतर मागासवर्गपेक्षा कमी आहे. या बाबी लक्षात घेता मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होते असे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण